Posts

Showing posts from August, 2023

श्रीरामपूर मध्ये बौद्ध तरुणांवर झालेल्या अत्याचार विरोधात आर पी आय ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांचा एल्गार.. श्रीरामपूर मध्ये हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश.

Image
श्रीरामपूर -  साखर कामगार हॉस्पिटलमध्ये मारहाण झालेल्या चार मुलांना भेटीसाठी व त्यांची विचारपूस करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) चे राष्ट्रीय अध्यक्ष आयु दीपक भाऊ निकाळजे यांच्या समवेत शेकडो कार्यकर्ते आले होते यावेळी शासकीय विश्रागृहावर याठिकाणी पत्रकारांशी बोलताना दीपक भाऊ निकाळजे म्हणाले की, पीडित मुलांपैकी काही मुले मातंग समाजातील व काही मुले बौद्ध समाजातील आहेत मात्र एकाच मुलाच्या नावानं बाहेर दाखल केलेले असून हे सरळ चुकीचे आहे त्यामुळे प्रत्येक मुलाच्या फिर्यादीनुसार नवीन तक्रार दाखल करणे गरजेचे आहे सदर अन्याय झालेल्या मुलांच्या नावाने  1) कुणाल देविदास मगर  2) शुभम विजय मागाडे 3)ओम अशोक गायकवाड 4) प्रणय अरविंद खंडागळे या 4 मुलांच्या फिर्यादीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची माध्यमातून हक्क आणि अधिकार प्रत्येक नागरिकाला संविधानाच्या माध्यमातून दिले आहेत आणि कायदा आमच्या बापाचा आहे कायदा आमच्या बापाने लिहून ठेवला आहे आम्ही शांत आहे मात्र आमच्या शांततेचा कोणी अंत पाहू नये....

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवी मुंबईतून सोशल मीडिया सेल या विभागात महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी श्री. तेजस उत्तम फणसे यांची नियुक्ती.

Image
पुणे - पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया फ्रंट विभागातर्फे सोशल मीडियाचे एक दिवसीय शिबिर दिनांक २० ऑगस्ट, २०२३ रोजी घेण्यात आले. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री. शरद पवार साहेब, खा. श्रीनिवास पाटील साहेब, प्रांताध्यक्ष श्री. जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा सुप्रियाताई सुळे, ज्येष्ठ नेते जितेंद्रजी आव्हाड, युवा नेते रोहित दादा पवार या सर्व मान्यवर मंडळींनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमांमध्ये माझी सोशल मीडिया सेल विभाग - महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदाचे नियुक्ती पत्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. जयंतजी पाटील साहेब यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया विभाग राज्यप्रमुख श्री. महादेव बालगुडे साहेब व कार्याध्यक्ष मा. मोहसिन शेख यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती मी नक्कीच येणाऱ्या काळात अतिशय विश्वासाने आणि प्रामाणिक पणे पार पाडेन. या शिबिरासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशस...

फॅशन डिझायनिंग स्किल डेव्हलपमेंट सेंटर मध्ये सुदत्त खरात यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन.

Image
सानपाडा नवी मुंबई - आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी फॅशन डिझायनिंग आणि ट्रेनिंग क्षेत्रातील नावाजलेली कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था ॲपेरल ट्रेनिंग सेंटर च्या सानपाडा विभागातील ट्रेनिंग सेंटर येथे समाजसेवक सुदत्त खरात आणी प्रतिक यादव यांनी फॅशन डिझाईनिंग चा कोर्स करणाऱ्या तरुण-तरुणींना मार्गदर्शन करून फॅशन क्षेत्रातील स्कोप व करिअर या विषयावर प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे उद्योजक मरचेंडायजर सुदत्त खरात यांची  प्रिय बहिण Vaishali Sandeep Salvi यांनी 2006 साली याच संस्थेमधून प्रशिक्षण घेऊन मेहनत करून मर्चंटडायसिंग क्षेत्रात प्रामाणिकपणे अथक परिश्रम करून स्वतःचे स्थान बनवले त्याचप्रमाणे माणिकचंद उद्योग समूहाचा पुणे येथील संपूर्ण बंगल्याचे मरचेनडायजिंग देखील आमच्या वैशाली ताईनेच केले होते तसेच वैशालीताईचे ऍडमिशन हे स्वतः सुदत्त खरात यांनी केले होते या त्यांच्या जुन्या आठवणींना देखील त्यांनी उजाळा दिला.  प्रसंगी उपस्थित सर्व तरुण-तरुणी विद्यार्थी यांनी प्रेरित होऊन स्वतःचे नाव देखील वैशालीताई प्रमाणेच उज्वल करण्याचे आश्वासन दिले प्रसंगी या संस्थेचे मुख्याध्यापक यांचे समाजसेवक स...

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात स्वच्छ सर्वेक्षणाच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी सूचनापेटी

Image
  पाम बीच - नवी मुंबई शहराची स्वच्छता ही ओळख बनलेली असून हा स्वच्छतेचा ब्रँड आणखी दृढ करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाच्या बळावर नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली आहे. कोणताही नावलौकिक प्राप्त करण्यापेक्षा तो नियमितपणे टिकवणे ही अधिक कठीण गोष्ट असते. त्यादृष्टीने स्वच्छता कार्यातील सुधारणेच्या विचार प्रक्रियेत महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कोणत्याही विधायक उपक्रमात स्वयंस्फुर्तीने सहभागी होणा-या नवी मुंबईकर नागरिकांनीही सक्रिय सहभागी व्हावे ही भूमिका आयुक्त श्री.राजेश नार्वेकर नजरेसमोर ठेवली आहे.       या अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्यदिनी 'स्वच्छतेची थ्री आर त्रिसूत्री' या कार्यक्रमामध्ये नागरिकांशी फेसबुक लाईव्हव्दारे थेट संवाद साधताना आयुक्तांनी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये वैचारिक लोकसहभाग घेणारा नाविन्यपूर्ण उपक्रम मांडला.      महापालिका अधिकारी / कर्मचारी यांनी आपल्या निवासस्थानाच्या आसपासच्या इमारती व भागातील स्वच्छतेवर बारकाईने लक्ष ठेऊन त्यामधील त्रूटी दूर करण्यासाठी जागरूकतेने काम करावे व 'स्वच्छतेसाठी योगदान देणारा कर्मचारी' बनावे...

बौद्ध धम्म परिषद उलवे कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्स्फूर्तपणे संपन्न ..आंतरराष्ट्रीय भंते भदंत बा डाविटो यांची उपस्थिती

Image
  उलवे रायगड - १९ऑगस्ट २०२३रोजी  बौद्ध धम्म परिषद कार्यालयाचे उलवे येथे उद्घाटन झाले. आयु. आदरणीय रामराव देवरे सर(सेवानिवृत्त मुख्याध्यापक)यांच्या हस्ते हा सोहळा झाला. आणि या सोहळ्यास आशिर्वाद देण्यासाठी आंतरराष्ट्रीय भंते वंदनीय भदंत बा डाविटौ तसेच वंदनीय भदंत बोधानंद थेरो,वंदनीय भदंत पुर्ण हे लाभले. तीनही भन्तेंचे आगमन होताच आपल्या बौद्ध भगिनींनी त्यांच्या मार्गावर पुष्प पाकळ्यांची पखरण आणि वर्षाव करून त्यांचे स्वागत केले. आणि कार्यालया पर्यंत घेऊन आले. फित कापून उद् घाटन झाल्या नंतर त्यांना आदराने कार्यालयात आसनस्थ केले.  त्यानंतर आयु. नरेश कांबळे (उपाध्यक्ष)यांनी सुत्रसंचालन करून सगळे विधी यथायोग्य पार पाडले. त्यानंतर भदंत बोधानंद थेरो यांनी धम्म देसना दिली. नंतर आयु. बाबुराव इंगळे (मार्गदर्शक)आयु. नरेश राऊत साहेब(कोषाध्यक्ष)मी स्वतः वामन वाघमारे(अध्यक्ष)आयु. विजय हबळे  (उप कोषाध्यक्ष)आयु. विनिता बर्फे मॅडम(को.क.सदस्य)आयु. वनिता कांबळे (सचिव)यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शेवटी सरणत्तेय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली. तद्नंतर आयु. शुभांगी लाळे (उप को...

19 ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिनाची माहिती जाणून घ्या. पुढील प्रमाणे

Image
जागतिक छायाचित्रण दिन - दहा-पंधरा वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाइल ने टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता, हाताळता येऊ लागले. तथापि, फोटोग्राफी या कलेतली रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची ‘एक्साइटमेंट’ तशीच आहे. हजार शब्दांत जे सांगता येणार नाही ते एक छायाचित्र सांगते, असे म्हणतात. छायाचित्र म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू व घटनेची टिपलेली प्रतिमा. छायाचित्रणाचा शोध कोणत्याही एका शास्त्रज्ञाने लावलेला आहे, असे म्हणता येणार नाही. या कलेमध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, गणित या विषयांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातल्या शास्त्रज्ञांचे यात योगदान आहे. चौदाव्या शतकात कॅमेरा आबस्कुरा किंवा कॅमेरा ल्युसिडा हा कॅमेरा लिओनार्दाे दा विंची याने वापरला, हे सर्वज्ञातच आहे. पुढे अठराव्या शतकात कॅमेरा आबस्कुराचा उपयोग त्यावेळचे चित्रकार देखावे चित्रित करण्यासाठी करत असत. या कॅमेऱ्यात सुधारणा क...

काय आहे मणिपूरच सत्य वाचा लेखात पुढील प्रमाणे - पूजा प्रकाश एन

Image
 मुंबई महाराष्ट्र-  निसर्ग रम्य पहाड़ी भागाने व्यापलेलं मणिपुर नैसर्गिक विविध संसाधनानी नटलेलं मणिपुर, सर्व जन गुण्यागोविंदाने राहत असतांना मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयान्वये मैतेइ समूहास आरक्षण दिल्या नंतर आरक्षण का व कोणाला? या प्रश्नांना घेऊन, मुलनिवासी कोण? मुलनिवासी यांना सुविधा दिल्या अशा अपप्रचाराची राळ उठवून नागा, मैतेइ,आणि कूकी या समूहामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या यंत्रणानी जो चुकीचा प्रचार करून मणिपुर पेटवलं , या देशविघातक कृत्य करणारयानी आपल्या देशाची अंतरराष्ट्रीय स्तरावर पत कमी होऊन नामुष्की चे शिक्के आपणास लागतील याचा जरा ही विचार केला नाही, राज्याच्या अंतर्गत सुरक्षास न जुमानता, कायद्याची पर्वा न करता माणुसकी तत्ववाद यास पायदळी तुडवून या देशातील येणाऱ्या पीढी साठी "एक काळा कुकर्म इतिहास" निर्माण केला अशा यास कारणभूत ठरणाऱ्या त्या सर्व घटकांचा भारतीय म्हणुन प्रत्येक देशप्रेमी नागरिकांनी निषेधच करायला हवा,मणिपूरमधील मूळ भारतीयांना हक्क देण्यास सुरुवात केली आहे, या गोष्टीचा विरोधकांना राग आला आहे. मणिपूर गेली कित्येक वर्षे काँग्रेसच्या ताब्यात होता....

महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योग रत्न पुरस्कार जगप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा सर यांना जाहीर

Image
मुंबई महाराष्ट्र - उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला 'उद्योगरत्न' पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. ‘टाटा म्हणजे ट्रस्ट. टाटा म्हणजे विश्वास अशी जगभर ख्याती असलेल्या उद्योग समूहाचे रतन टाटा यांना हा पुरस्कार देण्याने पुरस्काराचा सन्मान वाढला आहे,’असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पुरस्कार प्रदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. श्री. टाटा यांना त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह मान्यवरांनी २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व मानपत्र या स्वरुपात पुरस्कार प्रदान केला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, टाटा सन्सचे चेअरमन तथा महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, महाराष्ट्र औद्योग...

पाणी टंचाईवर अभिनव आंदोलन पाणी चोरांचा जाहीर निषेध करत कार्यसम्राट नगरसेवक सुरज पाटील यांची अतिरिक्त शहर अभियंत्यांना मडका भेट

Image
नेरूळ नवी मुंबई - पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.यामुळे नागरिकांना तीन तीन दिवस पाणी पुरवठा होत नाही, तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे आज आक्रमक होत अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांची भेट घेत आपले आक्रमक म्हणणे मांडले .तसेच त्याना मातीच्या  मडक्याची भेट दिली.त्याच बरोबर नवीमुंबईकरांचे हक्काचे पाणी इतर शहरांना वलती करणे त्वरित बंद करा अशी आग्रही मागणी केली.         नवी मुंबई पालिकेचे स्वतःचे मोरबे धरण आहे.मागील दीड दोन वर्षापुर्वी शहरतील नागरिकांना पाणी पुरवठा व्यवस्थित होत होता.परंतु कालांतराने शहारत मोठ्या प्रमाणात पाण्याबाबत प्रशासनाकडुन बेफिकरी,ईतर शहरांना पाणी वळते करने असे प्रकार वाढले. त्या प्रमाणे नेरूळ विभाग कार्यालय क्षेत्रातील कुकशेत, सारसोळे,नेरुळ कॉलनी परिसरात देखील हीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पाण्या विषयी समस्या निर्माण झाली आहे. आजच्या परिस्थिती मध्ये नेरूळ परिसरात पाणी पुरवठा नहोणे, अवेळी पाणी पुरवठा होणे,कमी दाबाने येणे,गढूळ पाणी नागरिकांना मिळत ...

प्रतिक्रांतीनंतरची समाज व्यवस्था - काय आहेत दिनकर सोनकांबळे यांचे विचार वाचा पुढीप्रमाणे

Image
मुंबई - (लेखक दिनकर सोनकांबळे ) प्रतिक्रांती  नंतर फक्त चार गटात जनतेची विभागणी केली होती. ब्राम्हण,क्षत्रिय,वैश्य आणि शूद्र( हिंदू) (म्हणून जाहीर पने बोलत शूद्रांना वेदांच्या मत्रांचा अधिकार नाही), यामुळे आजही हिंदू कडे वैदिकांचे वेद, मनुस्मृती, पुराणे असे साहित्य आढळून येत नाही. आज ज्या जाती निर्माण झालेल्या दिसत आहेत त्या खूप अलीकडील आहेत जसजसा प्रतिकार वाढत गेला जागृती होत गेली, तसतशी फूट पाडत गेले,  व्यवसायावर आधारित जाती निर्माण केल्या याचा परिणाम असा झाला की स्थान, भाषा आणि व्यवसाय वाचक समूह जात वाचक बनले. ज्यांनी बुद्ध धम्म सोडला नाही त्यांना हिन, बहिष्कृत, अस्पृश्य बनविले..आज  जे हिंदू आहेत ते एकवळेचे सर्व बौद्ध आहेत. ही बाब या देशातील ब्राम्हण जाणून आहेत..म्हणून त्यांनी अनेक हिंदूच्या (शुद्रांच्या) राज्याभिषेकाला विरोध केला. त्यांच्यावर जाचक अटी लादल्या. त्यात भोसले घराणे असेल..होळकर घराणे असेल..शिंदे/ गायकवाड घराणे असेल. हुन, डच पोर्तुगीज ब्रिटिश मुघल यांच्याशी संगनमत करून हिंदू राजांना संपविले. आजचा हिंदू युवक सज्ञान झाला तरी जोखड झुगारून टाकताना द...

बौद्ध धम्म परिषद उलवे नोड कार्यालयाचे येत्या शनिवारी उद्घाटन

Image
उलवे नवी मुंबई - रायगड प्रांतात नव्यानेच निवासी वसाहत झालेल्या उलवे रोड परिसरामध्ये येत्या शनिवारी दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोजी बौद्ध धम्म परिषद उलवे रोड नवी मुंबईच्या कार्यालयाचे उद्घाटन आयोजित करण्याचे ठरवलेले आहे आणि या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या उद्घाटन सोहळ्यासाठी विशेष करून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भदंत बा डावीटो यांना निमंत्रण केलेले आहे आणि त्यांनी या कार्यक्रमास येण्यासाठी देखील इच्छा प्रकट केलेली आहे. भदंत बा डावीटो हे कंबोडिया या राष्ट्रातून भारतामध्ये आलेले आहेत व त्यांच्याच जोडीला वंदनीय भंते बोदानंद थेरो तसेच भदंत पूर्ण हे देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती कंबोडिया येथील भदंत बोदानंद थेरो तसेच भदंत पूर्ण हे आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय रामराव देवरे हे आहेत. उलवे सेक्टर 20 प्लॉट नंबर 100 येथील श्रीजी सोसायटी मध्ये शॉप नंबर पाच मध्ये बुद्ध धम्म परिषद च्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.  कार्यकारणी समितीचे अध्यक्ष वामनदादा वाघमारे व इतर समिती या सर्वांनी  शनिवारी बौद्ध धम्म परिषद च्या कार्यालय उद्घाटन सोहळ्यासाठी...

Dr Nikkie Grover awarded by Indian women's History Museum

Image
Mumbai -  on the Occasion of 77 th Independence Day , Dr Nikkie Grover strongly referred to as “ The Woman Who walked her Dreams” is Awarded by Indian Women’s History Museum . Indian Women’s History Museum is a Public Space Created to Honour the Achievements of those Women who worked hard & Created history in their respective fields. The Museum is situated in Rajasthan & was inaugurated on Independence Day by MLA Mamta Bhupesh . It is a dedicated platform for those women who contributed to the Nation by thier Achievements in their Field of Work . They Strongly Support & encourage women who are passionate about their Work & believe that Such women should be celebrated & their work achievements should be preserved in the museum as our history is our strength. Dr Nikkie Grover being a visionary in the field of education created a portal for all the Educator’s globally by the name Eduwizer.com which is one of its kind in the Education sector . It’s a p...

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पालिका मुख्यालयावर तिरंगा रोषणाई

Image
पाम बीच नवी मुंबई - काल दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई पालिकेच्या मुख्यालयावरती तिरंगा रोषणाई करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी नवी मुंबई प्रांतातील लाखो नागरिकांनी पाम बीच रोड या ठिकाणी उपस्थित राहून स्वातंत्र्य दिन साजरा केला. प्रत्येक भारतीय सण उत्सवाच्या निमित्ताने पालिका मुख्यालयावर रोषणाई करून हे उत्सव साजरे केले जातात त्याचाच एक भाग म्हणून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देखील विशेष तिरंगा रोषणाई करण्यात आली होती. लाखो नवी मुंबईकरांनी या ठिकाणी उपस्थिती लावून स्वातंत्र्य दिन साजरा केला तसेच सोशल मीडियावर पालिका मुख्यालयाचे फोटोज व्हिडिओज रिल्स टाकून संपूर्ण वातावरण तिरंगामय करून टाकले.

नवी मुंबई पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न..

Image
नवी मुंबई -  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता 30 ऑगस्ट रोजी होत असून यावर्षीचा स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवात साजरा होणारा असल्याचे महत्व लक्षात घेत आयकॉनिक वास्तू म्हणून नावलौकिक असणा-या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या प्रांगणात आज भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्त  महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ यांचेसह विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारीवृंदाप्रमाणेच नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यालय इमारतीला केलेल्या नयनरम्य तिरंगी विद्युत रोषणाईमुळे भव्यतम मुख्यालय इमारतीच्या आकर्षणात भर पडलेली असून नागरिक मित्र, परिवारासह एकत्र येऊन तिरंगी झळाळी असलेल्या मुख्यालय वास्तुसोबत तसेच आतमध्ये ठेवलेल्या सेल्फी पॉईंटवर उत्साहाने छायाचित्रे काढताना दिसत आहेत. 16 ऑगस्टपर्यंत ही रोषणाई बघता येणार आहे. याशिवाय पावसाळी कालावधीत फडकविला न जाणारा मुख्यालय इमारतीसमोरील उंच व भव्यतम स्वरूपातील प्रतिकात्मक राष्ट्रध्वज...

घरोघरी तिरंगा’ उपक्रमांतर्गत 15 ऑगस्ट दिनी प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकविण्याचे पालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे आवाहन

Image
नवी मुंबई - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनाची सांगता 30 सप्टेंबर 2023 रोजी होत असून केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी 13 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.       कोणत्याही उपक्रमात स्वयंस्फुर्तीने सहभागी होणा-या नवी मुंबईकर नागरिकांनी या उपक्रमातही उत्साहाने सहभागी होऊन आपल्या घरावर 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकवून देशाविषयी आपल्या मनात असलेला अभिमान व्यक्त करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.       भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना जनतेच्या मनात भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती चिरंतन तेवत रहाव्यात तसेच देशभक्तीची जाज्वल्य भावना मनात कायम रहावी या भावनेने आपल्या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्याच्या उद्देशाने ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही राबविला जात आहे.       ...

समाजसेवक तेजस फणसे यांची राष्ट्रवादी सोशल मीडिया फ्रंट च्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

Image
मुंबई - महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या राजकारणात सदा सर्वांना समान न्याय देऊन सर्व जाती धर्माच्या व्यक्तीस लोकप्रतिनिधीत्व देण्याची संधी देऊन महाराष्ट्राच्या जनतेसाठी प्रामाणिक कार्य करणारी त्याचप्रमाणे लोकसेवेचा ध्यास घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद चंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोशल मीडिया फ्रंट युनिट सुरू करण्यात आली. या युनिटच्या अध्यक्षपदी महादेव बानुगडे व सह अध्यक्षपदी मोहसीन शेख आहेत. या सोशल मीडिया फ्रंट आघाडीच्या कार्यकारणी मध्ये नेरूळ नवी मुंबई प्रभागातील तरुण तडफदार समाजसेवक व कट्टर राष्ट्रवादी कार्यकर्ते आयु तेजस फणसे यांचे सोशल मीडिया फ्रंट च्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या एकूण नऊ जिल्ह्यांमध्ये सोशल मीडिया फ्रंटच्या कार्यकारणी मध्ये अनेक तरुण तडफदार पुरुष व महिला कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली त्याची यादी पुढीलप्रमाणे.

भारतातील ग्रामीण शैक्षणिक व्यवस्थेतील समस्या व उपाय - पुजा प्रकाश एन

Image
नवी मुंबई - गेल्या दशकभरात नव्या शैक्षणिक धोरणांमुळे शिक्षण क्षेत्रात प्राथमिक-माध्यमिक स्तरावर नवनवे प्रयोग होत आहेत. नवे शैक्षणिक धोरण, कायदे यामुळे शिक्षणाच्या पारंपरिक ढाच्यात आमूलाग्र बदल आस्ते कदम का होईनात होत आहेत हे निश्चितच स्वागतार्ह आहे, पण अजूनही ही ‘अडथळ्यांची शर्यत’ ठरत आहे. भारतात आजघडीला पालकांची खर्च करण्याची ऐपत जेवढी आहे, त्याप्रमाणे प्राथमिक शिक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एक मूल वातानुकूलित वर्गात चौथीला परदेशाचा भूगोल शिकत असते, दुसरे भारताचा अन् तिसऱ्याला पुस्तक कुठे आहे हेच माहीत नसते ,  दुसरीकडे अजूनही समाजातील मोठा वर्ग प्राथमिक शिक्षणाच्या परिघाबाहेर आहे. ही एक नवीन वर्गव्यवस्था निर्माण होत आहे. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत आजही खासगी विनाअनुदानित शाळांचे व्यवस्थापन उदासीन आहे. या कायद्यानुसार समाजातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विनाअनुदानित शाळांत काही जागा राखीव ठेवण्याची कार्यवाही शासनातर्फे सुरू झाली, त्या वेळी खासगी शाळांच्या व्यवस्थापनांनी आणि उच्चभ्रू पालकांनीही न्यायालयात धाव घेतली. का?, तर या...

ज्येष्ठ विचारवंत लेखक साहित्यिक आंबेडकरी चळवळीचे पुरस्कर्ते हरी नरके यांचे निधन

Image
पुणे - ज्येष्ठ लेखक, विचारवंत  पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला, समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. Asian Heart Hospital मध्ये घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 60 व्या वर्षी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समता परिषदेच्या उद्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी हरी नरके आजच पहाटे पुण्याहून मुंबईला येत होते. येताना पहाटे त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला त्यामुळे बीकेसीच्या एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.  हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला, त्याचे संपादक हरी नरके होते. डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने 26 खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपाद...

9 ऑगस्टला ज्वेल ऑफ नवी मुंबई नेरूळ येथे ‘माझी माती माझा देश’ उपक्रमांतर्गत विशेष कार्यक्रम

Image
   ने रूळ नवी मुंबई - स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या व वीर सैनिकांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने  ‘ माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी माटी मेरा देश (Meri Maati Mera Desh)’ हे राष्ट्रव्यापी अभियान  जाहीर करण्यात आले आहे. यानिमित्त देशभरात प्रत्येक गावशहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वीरांना अभिवादन केले जात असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शासन निर्देशानुसार  9 ते 14 ऑगस्ट 2023 या कालावधीत विविध उपक्रम राबविले जात आहेत. याबाबत शासन स्तरावरुन वेबसंवादाव्दारे झालेल्या विशेष बैठकीत कार्यक्रम आयोजनाविषयी देण्यात आलेल्या सूचनांच्या अनुषंगाने नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येऊन दिनांक 9 ऑगस्ट रोजी ‘माझी माती माझा देश’ अभियानाच्या विशेष कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपआयुक्त...

पंतप्रधान मोदी यांना पुणे येथे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Image
पुणे - देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळकांचे मोठं योगदान असल्यामुळे इंग्रजांना देश सोडून जावं लागलं. खुद्द महात्मा गांधी यांनी टिळकांना आधुनिक भारताचं महानायक म्हटलं होतं. आज देशाला लोकमान्यांचे विचार प्रेरणादायी आहेत, असे प्रशंसोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी( 1 ऑगस्ट) पुणे येथे काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये बोलतांना नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याला उजाळा दिला. सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष दिपक टिळक आदी उपस्थित होते. मोदी पुढे म्हणाले की, जेव्हा कुठला पुरस्कार मिळतो, तेव्हा एक जबाबदारी येते. हा पुरस्कार मी 140 कोटी देशवासियांना समर्पित करतो. देशवासियांच्या सेवेत, अपेक्षांमध्ये कोणतीही ...

सातारच्या मुली जगात भारी..17 वर्षीय आदितीने वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिपवर कोरलं भारताच नाव, देशभरातून कौतुकाचा वर्षाव..

Image
World Archery Championship: साताऱ्याच्या 17 वर्षी आदिती स्वामीने तिरंदाजीमध्ये इतिहास रचला आहे. आदितीने शनिवारी वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशीपमध्ये (World Archery Championships) कंपाउंड महिला फायनलमध्ये विजय मिळवलाय. आदितीने मॅक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिचा पराभव करत चॅम्पियनशीपवर नाव कोरले. आदितीने जुलै महिन्यात लिमरिकमध्ये युवा चॅम्पियनशिपमध्ये अंडर-18 मध्ये विजय मिळवला. फायनलमध्ये तीने 150 पैकी 149 गुणांची कमाई केली होती. 

रासायनिक दूषित पाणी सोडल्यामुळे तळोजा येथे बकऱ्यांचा मृत्यू पशू व मानवी जीवन झाले धोकादायक

Image
तळोजा पनवेल - तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधून वाहणाऱ्या कासाडी नदीमध्ये रासायनिक पाणी सोडल्यामुळे नावडा येथील शेतकऱ्याच्या 8 बकऱ्या दगावल्या आहेत, अशी माहिती माजी नगरसेवक तसेच रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांनी दिली आहे. नावडे गावातील बुधा अनंता म्हात्रे या शेतकऱ्याच्या या बकऱ्या होत्या.कासाडी नदीच्या प्रदूषणाबाबत माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे हे न्यायालयीन लढा लढत आहेत. प्रदूषणाबाबत आठ जुलै रोजी त्यांनी ईमेल केले होते, जर योग्य कारवाई झाली असती तर शेतकऱ्याच्या बकऱ्या मरण पावल्या नसत्या, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कासाडी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी किती संघर्ष करावा लागला तरी चालेल मी मागे हटणार नाही, असा इशाराही माजी नगरसेवक अरविंद पुंडलिक म्हात्रे यांनी दिला आहे.

वाचा पूजा प्रकाश एन.यांनी मांडलेले विचार भारतीय महिलांचे राजकीय सत्तेतील योगदान व सद्य स्थिती..

Image
मुंबई महाराष्ट्र -  अतुलनीय दयाभाव, सहनशीलता, सहनशक्ती, कठोर परिश्रमांनी भारतीय महिलांच्या पिढ्यांपिढ्यांनी राष्ट्रनिर्माण करीता अतुलनीय योगदान दिले आहेच, इतिहासातील नोंदीचे विश्लेषण केले असता असे दिसून येते की महिला राजकारणात नुसत्या सक्रिय नव्हत्या तर त्याचा निर्णय प्रक्रियेमध्ये, राजकीय व सामाजिक चेतना प्रफुल्लित करण्यामध्ये मोलाचे योगदान आहे हे विसरता काम नये. भारतात अगदी आर्यांच्या काळापासून स्त्रियांना समाजात महत्त्वाचे स्थान आहे. ऋग्वेदात महिलांना राजकारणात स्थान असल्याचेही दर्शविले आहे. उपनिषद, पुराणकाळात ते कायम होते. विरांगना म्हणून दुर्गा,काली, चंडी, विद्येची सरस्वती,धनार्जनाधीन लक्ष्मी, यांचे नेतृत्व,तर बौद्धिक व समतेच्या तत्वाच्या वाहक म्हणून बौद्ध कालीन गार्गी,मैत्रेयी, या विभूति ही होत्या कालांतराने परकीय आक्रमणानंतरही काही स्त्रिया साम्राज्य विस्तार च्या धोरणात कटाक्षाने लढतांना दिसतात. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्रोत्तर काळात अनेक भारतीय स्त्रियांनी अनेक क्षेत्रात आपल्या कामाने ठसा उमटविला आहे.भारताच्या इतिहासात महिलांचा राजसत्तेत जसा सहभाग होता तसा तो...

नवी मुंबई पालिका अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नती देण्याचा आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांचा निर्णय

Image
नवी मुंबई - मागील ब-याच वर्षांपासून प्रलंबित असलेले नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांचे पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, बदली असे विविध प्रश्न मार्गी लावण्याकडे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे बारकाईने लक्ष असून आज 7 संवर्गातील आणखी 69 अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.       यामध्ये अधिक्षक पदावर 24, वरिष्ठ लिपिक / कर निरीक्षक पदावर 26, लेखाधिकारी पदावर 2, सहाय्यक लेखाधिकारी पदावर 4, उपलेखापाल पदावर 7, आरोग्य सहाय्यक महिला पदावर 6, सहा. अग्निशमन केंद्र अधिकारी पदावर 6 अशाप्रकारे 7 संवर्गात 69 महापालिका कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे.       मागील दोन वर्षात 45 संवर्गातील 348 अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आलेली असून आता पदोन्नती लाभलेल्या कर्मचा-यांची संख्या 417 इतकी झालेली आहे. सुरूवातीला पहिल्या टप्प्यात चतुर्थ व तृतीय श्रेणीतील कर्मचारी यांच्या पदोन्नतीवर लक्ष केंद्रीत करून त्यानंतर इतरही श्रेणीतील कर्मचा-यांना पदोन्नती देऊन सर्व घटकांतील क...

नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी आणि अँटी टेररिस्ट स्क्वाड कडून मुंबईत छापा हस्तकाला अटक

Image
मुंबई - राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सदैव कार्यरत असणाऱ्या एटीएस आणि एनआयए कडून सध्या महाराष्ट्रात धापेमारी केली जात आहे. त्यातच आज भिवंडीतील पडघा येथे छापेमारी करण्यात आली. आयएसआयशी संबध असल्या प्रकरणी अकीब नाचन यांच्या घरी छापेमारी करण्यात आली. अकीब नाचन याला एनआयएने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. यापूर्वी पाच जणांना एनआयएने अटक केली आहे. त्यात मुंबईतून एक, पडघ्यातून दोन, पुण्यातून दोन अशा पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. भिवंडीतील पडघ्यातून अटक केलेले झुल्फिकार अली बरोडावाला आणि जुबेर खान हे दोघे पडघ्यात भाड्याने राहत होते. या दोघांना अकीब नाचन याने आर्थिक मदत केल्याचा दावा एनआयएने केला आहे. त्यामुळे अकीब नाचन याच्या घरावर एनआयएने छापेमारी करुन त्याला ताब्यात घेतलं आहे.

Breaking News Buldhana शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्क मागणीसाठी जिल्हा परिषद आवारात विद्यार्थी सोबत आलेल्या पालकांवर प्रशासनाकडुन गंभीर गुन्हे दाखल

Image
बुलढाणा -(बातमीदार PN) एकीकडे शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी प्रभावी पणे व्हावी, शिक्षणापासून कोणीही वंचित राहु नये यासाठी प्रशासन कार्यरत असतांनाच माटरगाव, ता.खामगाव ,जिल्हा बुलढाणा येथील शाळेच्या दुरावस्था बद्दल , व शिक्षकच्या मागणी करीता , दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन द्यावे या मागणी करीता विद्यार्थी आपल्या पालकांसह जि.प.कार्यालय बुलढाणा येथे आले असता प्रशासनाने विद्यार्थ्यांना चिखल असलेल्या जागेत तब्बल तीन तास बसवले विद्यार्थी यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाहीत सोळा वर्ष आतील विद्यार्थी यांना प्रशासनाने पिण्याचे पाणी सुद्धा वेळेवर उपलब्ध करुन दिले नाही, शेवटी पालकांनी पुढाकार घेऊन पाणी कॅन विकत आणुन तहानलेल्या विद्यार्थी यांना पाणी दिले गेले, तसेच जेवणासाठी तरी विद्यार्थी यानी कार्यालय पॅसेज वा छताखाली बसुन जेवण करु द्या, बाहेर उघड्यावर जेवल्यास पाऊस आल्यावर आमच्या जेवणात पाणी पडेल अशी विनंती केल्यावर सुद्धा प्रशासनाने विद्यार्थ्यांना जेवणासाठी छताखाली येऊ दिले नाही. परिणामस्वरूप विद्यार्थ्यांना पावसाळी वातावरणात उघड्यावर जेवण करावे लागले...

कंजंक्टिवाईटीस आजाराच्या पार्श्वभूमीवर डोळ्यांची काळजी घेण्याविषयक नवी मुंबई पालिकेचे आवाहन.

Image
नवी मुंबई-   राज्यात   इतर   भागाप्रमाणे   ( नवी   मुंबई   महानगरपालिका   कार्यक्षेत्रात )   कंजंक्टिवाईटीस   हा   डोळयांचा   आजार   सर्वत्र   दिसत   आहे .  कंजंक्टिवाईटीस   विषांणूंमुळे ,  रोगजीवाणूंमुळे ,  परागकण   किंवा   धूर   किंवा   धुळीसार खे ॲलर्जी करणांमुळे   होतो .  हा   पावसळयात   पसरतो   आणि   लहान   मुलांमध्ये   व   प्रौढांमध्ये   तो   संसर्गजन्य   असतो .  डोळयाचा   विषाणूजन्य   संसर्ग   मुख्यत्वये   ॲडिनो   वायरस   मुळे   होतो .  सध्या   न . मुं . म . पा   रुग्णालयात   कंजक्टिव्हाटीस   चे   रुग्ण   नेहमी   पेक्षा   जास्त   प्रणात   आढळून   येत   आहे त . कंजंक्टिवाईटीस   लक्षणे - ·          श्लेष्मल   निघणारे ,  लाल   आणि ...