Posts

Showing posts from September, 2023

महिला आरक्षण विधेयकाची तत्काल अमंलबजावणी करुन, संसदीय लोकशाहीत भारताने जगात आदर्श निर्माण करावा - ॲड . पुजा प्रकाश एन.

Image
पुणे - यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:। ज्या देशामध्ये अनादी काला पासून स्त्री महिमा गायल्या जातो, स्त्री चे मोठेपण स्विकार करण्यासाठी स्त्री महात्म्य वर्णिलं जातं, मातृसत्तात्मक संस्कृति चे ऐतिहासिक दाखले ज्या भूमि मध्ये अभ्यास क्रमात समाविष्ट असतात, मातृसत्तात्मक पद्धती चे मोठेपण स्विकार करुण स्त्री ला विद्येची देवता, घराची करुणा, व जन निर्मीतीचा अविष्कार समजलं जातं, त्याच भूमीत मध्ययुगीन कालात स्त्री वर्गावर अन्याय अत्याचार वाढतात,तीचं महात्म्य नाकारुण स्त्री शक्ति ला, मातृशक्ति ला दास्यत्वात ढकललं जात या दास्यत्वात ढकलून कर्मीक बंधनात अडकवून स्वातंत्र्य हिरासत गुलाम म्हणून हिणवल्या गेलं, या अशा मानवीय समूहास कंलकीत ठरणाऱ्या संस्कृति व साहित्य निर्माण कर्त्याचा निषेध करायला हवा.या मध्ययुगीन कालात भारतीय संस्कृति च्या स्त्री विषयक दृष्टिकोन अन्याय जोर जुल्म असा जबरदस्त असतांना सुद्धा बरयाच स्त्रीयांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा ऐतिहासिक दस्ताऐवजा मध्ये सुवर्णांकींत अक्षरांनी कोरुण...

बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक या दरम्यान होणाऱ्या मेगाब्लॉकसाठी परिवहन उपक्रमाकडून विशेष जादा बसेसची व्यवस्था…

नवी मुंबई - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने पनवेल रेल्वे स्थानक येथे मुख्य पायाभूत सुविधा संबंधित कामकाजाकरीता बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक या दरम्यान दि.30/09/2023 रोजी रात्रौ 23.00 पासून ते दिनांक 02/10/2023 रोजी दुपारी 13.00 वाजेपर्यंत 38 तासांचा मेगाब्लॉक घेतलेला आहे. त्यामुळे बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक दरम्यान लोकल रेल्वेची सेवा बंद राहणार आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून वरील मेगाब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सोयीकरीता 28 विशेष बसेसने 232 फेऱ्यांद्वारे बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक दरम्यान दैनंदिन धावणाऱ्या विविध मार्गाच्या 46 बसेसच्या 196 फेऱ्या देखिल प्रवाशांना उपलब्ध होतील. उक्त मेगाब्लॉक कालावधीत खारघर व तळोजा विभागातून विविध मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांची गैरसोय होवू नये म्हणून खारघर रेल्वे स्थानकाऐवजी बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंत बसेस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तसेच खारघर रेल्वे स्थानक येथून सुटणारे मार्ग हे बेलापूर रेल्वे स्था...

नवी मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या हस्ते सन्मान

Image
नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून विहित वयोमानानुसार सप्टेंबर महिन्यात सेवानिवृत्त होणारे मुख्याध्यापक श्री. सूर्यभान कलवार तसेच वरिष्ठ लिपिक- कर निरीक्षक श्री गणेश भालेराव या दोन कर्मचाऱ्यांचा नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते शाल, सन्मानचिन्ह  व ग्रंथभेट देऊन सन्मान करण्यात आला.           याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ तसेच शहर अभियंता श्री. संजय देसाई, प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री. शरद पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे, भांडार विभागाच्या उपायुक्त श्रीम. मंगला माळवे आणि इतर अधिकारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी कर्तव्यभावनेने केलेल्या सेवाकार्याचा गौरव करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

355 सफाईमित्रांची कुटुंबियांसह सफाईमित्र सुरक्षा शिबिरात आरोग्य तपासणी

Image
    नवी मुंबई- ‘स्वच्छता ही सेवा’ या राष्ट्रव्यापी उपक्रमांतर्गत लोकसहभागातून स्वच्छताविषयक विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. यामध्ये दैनंदिन साफसफाई कामात समर्पित भावनेने दररोज योगदान देणा-या सफाईमित्रांकरिता नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेद्रात सफाईमित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 355 सफाईमित्र व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली व विविध चाचण्यांच्या अहवालानुसार त्यांस आवश्यक वैद्यकिय मार्गदर्शन करण्यात आले.       सर्व ऋतुंमध्ये सफाईमित्र दररोज सकाळपासून शहर स्वच्छतेचे काम मनोभावे करीत असतात. बरेचदा त्यांच्याकडून स्वत:च्या आरोग्याविषयी आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. अशावेळी त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी केली जावी यासाठी पुढाकार घेत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिका मुख्यालयात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सफाईमित्र व त्यांच्या कुटुंबियांकरिता सफाईमित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.       या शिबिराचे आयोजन हार्ट फा...

1 ऑक्टोबरला ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमात हजारो नवी मुंबईकर रस्त्यावर उतरून करणार एक साथ, एक तास श्रमदान

Image
नवी मुंबई- ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत नुकतेच 17 सप्टेंबरला सकाळी ठीक 8 वा. शहराच्या 8 विभागांत 1 लाख 14 हजार इतक्या मोठ्या संख्येने नवी मुंबईकर नागरिकांनी एकत्र येत स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली, ज्याची विक्रमी नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये घेण्यात आली. अशाच प्रकारचा आणखी एक विशेष उपक्रम मा. पंतप्रधान महोदय यांच्या देशव्यापी आवाहनानुसार रविवार, दि. 1 ऑक्टोबर 2023 रोजी, सकाळी ठीक 10 वाजता एकाच दिवशी एकाच वेळी नागरिकांनी आपापल्या विभागात एकत्र येऊन स्वच्छतेसाठी श्रमदान करून यशस्वी करावयाचा आहे. याबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांनीही हा उपक्रम म्हणजे लोकचळवळ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या अनुषंगाने स्वच्छतेमध्ये नेहमीच अग्रेसर असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेने हा ‘स्वच्छांजली’ उपक्रम भव्यतम स्वरूपात आयोजनाकरिता तसेच मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार याव्दारे स्वच्छतेची लोकचळवळ उभी रहावी या हेतूने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, उद्याने, स्टेशन, डेपो, मार्केट, आरोग्य केंद्रे, नाला परिसर, पडीक जागा अशा तब्बल 267 ठिकाणी विशेष...

इंडियन स्वच्छता लीग 2' मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे '3 बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’

Image
    नवी मुंबई -  ‘इंडियन स्वच्छता लीग 2’ मध्ये सहभागी होताना नवीन उच्चांक प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून सहभागी झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने लीग अंतर्गत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छताविषयक अभिनव उपक्रमांचे आयोजन केले होते. या उपक्रमांची विशेष दखल राष्ट्रीय पातळीवर ‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने घेण्यात आलीच, शिवाय ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ या राष्ट्रीय पातळीवर आगळ्यावेगळ्या विक्रमांची नोंद घेणा-या संस्थेमार्फतही यांची विशेष दखल घेत ‘इंडियन स्वच्छता लीग’मधील नवी मुंबई महानगरपालिकेच्या 3 वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांना 3 ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ने गौरविण्यात आलेले आहे. राष्ट्रीय विक्रमांची नोंद असलेली ही तिन्ही ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ची विक्रमी प्रमाणपत्रे बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्सचे भारतातील परीक्षक आंतरराष्ट्रीय क्रीडापटू श्री.बी.बी. नायक यांनी महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांना प्रदान केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम.सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाब...

भारतीय न्याय प्रणालीचा संक्षिप्त आढावा - Adv. Pooja Prakash n

Image
नवी मुंबई - ज्या महापुरुषांच्या विचारधारा, व कर्तव्याने मला रचनात्मक कार्य करण्याची समज प्राप्त झाली, दिशा मिळाली त्यापैकी एक महापुरुष म्हणजे परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी इ. स. १९२३ ला विधी पदवी प्राप्त केली २०२३ ला त्या सुवर्णक्षणाला एक शतक (१०० वर्ष) पूर्ण झाले,आणि या शतकपूर्ती वर्षीचं मला सुद्धा विधी पदवी व सनद प्राप्त झाली, त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन,बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन माझ्या ही हातुन बाबासाहेबां सारखचं देदिप्यमान कार्य घडो, या जाज्वल्य इच्छा सह कार्यरत होवो करीता.. विधी पदवी ग्रहणानंतर सनद प्राप्ती झाली, त्या प्रित्यर्थ #बाबासाहेब आपल्या अतुलनीय कार्यास मानाचा मुजरा..         आपण भारतीय असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. तितकाच आपल्याला आपल्या भारतीय राज्यघटनेचा अभिमान आहे. आपली भारतीय लोकशाही चार आधार स्तंभांवर उभी आहे- विधिमंडळ, नोकरशाह, न्यायसंस्था आणि प्रसार माध्यमे. लोकशाहीची शक्ती या चारही स्तंभांच्या सामर्थ्यावर अवलंबून असते, आणि हेच आधारस्तंभ एकमेकांना पूरक हवेत. कोणताही अस्थिर आधारस्तंभ लोकशाहीच्या रचनेला कमकुवत क...

26,133 नवी मुंबईकरानी वंडर्स पार्कमध्ये घेतली स्वच्छतेची डिजीटल शपथ

Image
नवी मुंबई - इंडियन स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने विविध उपक्रम राबविले असून यामध्ये व्यापक लोकसहभागावर भर दिला आहे. रविवारी 17 सप्टेंबरला आठही विभागांमध्ये नऊ ठिकाणी सामुहिक स्वच्छता शपथ हा उपक्रम भव्यतम स्वरुपात राबविण्यात आला ज्यामध्ये 1 लक्ष 14 हजार हून अधिक विदयार्थी, युवक व नागरिकांनी सहभागी होत नवी मुंबईच्या स्वच्छता विषयक जागरुकतेचे व एकात्मतेचे विशाल दर्शन घडविले. अशाच प्रकारे आजच्या डिजीटल युगाला साजेसा अभिनव उपक्रम नवी मुंबईचे आकर्षण केंद्र असलेल्या वंडर्स पार्क येथे राबविण्यात आला. या ठिकाणी एका दिवसात 26 हजार 133 नागरिकांनी स्वच्छतेची डिजीटल शपथ घेत स्वच्छ शहराविषयी असलेली आपली बांधिलकी प्रदर्शित केली.    ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानामध्ये ‘कचरामुक्त भारत’ ही संकल्पना नजरेसमोर ठेवून कचरामुक्त शहरांच्या उभारणीत प्रामुख्याने तरुणाईला सहभागी करुन घेत कचऱ्याविरोधात युवकांची लढाई (Youth V/S Garbage) या घोषवाक्यानुसार नव्या पिढीत स्वच्छतेचे महत्व रुजविले जात आहे. महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर...

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत नवी मुंबई पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची लक्षणीय कामगिरी

Image
नवी मुंबई - भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने चंद्रयान 3 मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या ठाणे जिल्हा तालुका पातळीवर नोंदणी झालेल्या 424 प्रकल्पांमधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या 25 शाळांमधील 75 इतक्या मोठया संख्येने प्रकल्पांची जिल्हास्तरावर निवड झाली असून नमुंमपाच्या शिक्षण व्हिजनचे हे यश असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी ठाणे जिल्हयातून तालुका पातळीवर 424 विज्ञान प्रकल्पांची विक्रमी नोंदणी झाली. यामधील 283 प्रकल्पांची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली. या प्रकल्पांमध्ये आरोग्य व स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व पारंपारिक ऊर्जा, शेती व अन्न सुरक्षा तसेच आपत्ती व्यवस्थापन या विषयांचा समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये लर्नींग लिंक्स फाऊंडेशन आणि एडब्ल्यूएस इनकम्युनिटीज् या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘एडब्ल्यूएस थिंक बिग स्पेस’ या उपक्रमांतर्गत हे प्रकल्प राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेकडे पाठविण्यात आले होते. यामधून इयत्ता 6 वी ते 8 वी च्या 25 शाळांमधील विदयार्थ्यांच्या 75 प्रक...

fast news india Highlights

Image
•Ministry of Railways revises the amount of ex-gratia relief paid to the dependents of dead and injured passengers involved in Train Accidents and Untoward Incidents •​​​​​​​PM Narendra Modi interacts with ground level functionaries of G20 Summit at Bharat Mandapam •India’s First Lighthouse Festival begins in Goa from Tomorrow •Nasha Mukt Bharat Abhiyaan (NMBA) - MoU signed between Department of Social Justice & Empowerment and the All World Gayatri Pariwar •Women MPs meet PM after passage of the Nari Shakti Vandan Adhiniyam •Union Health Secretary Shri Sudhansh Pant presides over the National Urban Health Conclave on “Developing a Joint Roadmap for Strengthening Health Systems Resilience” •INS NIREEKSHAK DEPARTS TRINCOMALEE •MOU BETWEEN INDIAN NAVY (IN) AND INDIAN INSTITUTE OF SCIENCE (IISC) BENGALURU •INDIAN NAVAL SHIP SAHYADRI PARTICIPATES IN THE MAIDEN INDIA-INDONESIA-AUSTRALIA TRILATERAL MARITIME EXERCISE •Chief Minister of Arunachal Pradesh calls on Prime Ministe...

Grand Event ..Mrs Raigad 2023 Organized by Star maker Deepak Shetty...celebrates 10 year completion anniversary.

Image
Kharghar - On Saturday, 16th September Deepak Shetty's DS Entertainment held yet another project of beauty, brilliance and grace this time making Raigad District a protagonist, Mrs. Raigad 2023 Season 6 #KhwaabPuraneUmeedNayi. It was a subtle yet extravagant collaboration of New faces on stage with a drive to use the platform for their cause. The show had a fair flowchart of 2 Rounds with 2 different designers namely KP Couture for their traditional outfits and Nafi creations by Nafisa Khan with their Western Gowns.  The models looked absolutely breathtaking and showcased hardwork, dedication, beauty, confidence with all the grace and poise in the moment.  The Grooming Mentor for the season was Nishitha Suvarna Image Consultant and Runway Choreography wqs done by Mr. Dinesh Rajpurohit.  With a fair and square judgement, while the Judging Panel had Mrs. Shabana Rajapkar & Mrs. Nishigandha Kusale.  Along with Guests Like Mr. Vijay Shukla VP of Lomat New...

आरक्षण कोणासाठी व कशासाठी?? - ॲड.पूजा प्रकाश एन.

Image
पुणे - आरक्षण हा भारतातील एक महत्वाचा परंतु वादाचा विषय झाला आहे. आरक्षणामागील मुख्य उद्देश समाजातील दुर्बल घटकांचे सक्षमीकरण हे होते. आरक्षणाचा मुद्दा जातीविरुद्ध जाती असा लढण्याचा नाही; तर दुर्बल घटकांची बाजू समर्थपणाने मांडण्याचा आहे. महाराष्ट्रात मराठा तसे गुजरातमध्ये पटेल, अन्य ठिकाणी जाट अशा बहुसंख्य जाती ज्या सवर्णातील आहेत, त्यांचीही अशीच मागणी आहे आणि विचार होताना सर्वांगीण व्हावा लागेल. न्यायालयीन निकषांमध्ये एकदा एक जात किंवा संवर्ग मागासलेला म्हटले की तो सदासर्वकाळ मागासलेलाच धरला जावा असे म्हणता येणार नाही. म्हणून त्यांचे होणारे सामाजिक, शैक्षणिक आर्थिक उत्थापनही लक्षात घ्यावे लागेल. आजचे वास्तव मात्र असे दिसते की राजकीय लाभ व्हावा म्हणुन नेतेमंडळी तरुणाईची डोके भडकावून हा प्रश्न रस्त्यावर आंदोलन, संप,मोर्चे या माध्यमातून सोडवू इच्छितात. त्याऐवजी हा प्रश्न राजकीय मंडळींनी  संसदेच्या व विधानसभा गृहाच्या कनिष्ट व वरिष्ठ अशा दोन्ही प्रकार च्या सभागृहात प्रत्येक निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी ने सामोपचाराने विचार मंथन करुन आजपर्यंत  सोडवायला पाहिजे होता.. पण ...

दिव्यांग विद्यार्थ्यांनी इटीसी केंद्रामधील कार्यशाळेत साकारले इको फ्रेंडली बीजगणेश

Image
       नवी मुंबई - 19 ते 28 सप्टेंबर 2023 या कालावधीत संपन्न होणारा श्रीगणेशोत्सव पर्यावरणशील रितीने साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईकर नागरिकांना केलेले आहे. त्यादृष्टीने देशात प्रसिध्द असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्राच्या वतीने इको फ्रेंडली बीजगणेश बनविण्याच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.           या अभिनव उपक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत उत्तम प्रतिसाद दिला. या उपक्रमाद्वारे बालगणेशाबद्दल मुलांच्या मनात असलेले आकर्षण लक्षात घेऊन त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी व मुलांमध्ये पर्यावरणाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून रुजविण्यासाठी बीजगणेश निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती इटीसी केंद्र संचालक तथा सहा. आयुक्त डॉ. मिताली संचेती यांनी दिली.           या इको फ्रेंडली बीजगणेश बनविण्याच्या उपक्रमात श्रीमूर्ती बनविताना मातीत तुळशीची बीजे अर्थात मंजु...

इकोफ्रेन्डली गणशोत्सव साजरा करताना नवी मुंबईत तब्बल 139 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती जलप्रदूषण टाळण्याचे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे आवाहन

Image
नवी मुंबई - पर्यावरणपूरकतेची कास नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच धरलेली असून मोठया प्रमाणावर साजरा होणारा श्रीगणेशोत्सव पर्यावरणाची जपणूक करुन इकोफ्रेंडली स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने नवी मुंबईकर नागरिकांना यापूर्वीच करण्यात आले असून त्याला नागरिकांचा व गणेशोत्सव मंडळांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी श्रीगणेशोत्सवामध्ये मंडप उभारणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारण्याचा निर्णय जाहीर केला असून त्याचे सर्व गणेशोत्सव मंडळांनी स्वागत केले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सवामध्ये मंडप उभारण्याकरिता परवानगी मिळण्यासाठी मंडळांना अर्ज करण्यास 18 ऑगस्टपासून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयात विशेष कक्ष स्थापित करण्यात आला असून मंडळांना विहित कालावधीत परवानगी मिळावी याची खबरदारी घेतली जात आहे. तलावातील जलप्रदूषण रोखण्यासाठी 14 मुख्य तलावातील जलाशयाच्या साधारणत: 30 टक्के ...

श्रीगणेशोत्सव सुव्यवस्थित संपन्न होण्याकरिता नमुंमपा आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांचे सर्व यंत्रणाना दक्षतेचे निर्देश

Image
नवी मुंबई - महानगरपालिका क्षेत्रातील श्रीगणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका व पोलीस यंत्रणा यांच्यासह सर्व प्राधिकरणे सज्ज झाली असून परस्पर समन्वय राखून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिले. ‘श्रीगणेशोत्सव 2023’ च्या पार्श्वभूमीवर नमुंमपा आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनविषयक बैठक महापालिका मुख्यालयात संपन्न झाली. यावेळी आयुक्तांनी प्रत्येक बाबीचा बारकाईने आढावा घेत तत्पर कार्यवाहीचे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार तसेच परिमंडळ 1 चे पोलीस उपआयुक्त श्री. विवेक पानसरे व वाहतुक पोलीस विभागाचे उपआयुक्त श्री. तिरूपती काकडे तसेच संबंधित विभागप्रमुख, सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिकारी उपस्थित होते. यामध्ये मंडपासाठी ऑनलाईन परवानगी अर्ज दाखल करणा-या मंडळांचा आढावा घ...

मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष बैठक

Image
नवी मुंबई - मतदार यादी हा निवडणूक प्रक्रियेतील एक अत्यंत महत्त्वाचा भाग असून निर्दोष मतदार यादी ही निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्याची पहिली आणि महत्वाची पायरी असल्याचे सांगत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी निवडणूक कामकाजाचे महत्त्व लक्षात घेऊन मतदार यादीत नवीन सेक्शन अॅड्रेस टाकणे व सेक्शन अॅड्रेस अद्ययावत करण्याचे काम काळजीपूर्वक करावे असे सूचित केले. मा.भारत निवडणूक आयोग व मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे निर्देशानुसार मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 घोषित करण्यात आला असून त्याबाबत माहिती देण्याकरिता व त्याबाबतच्या कार्यवाहीला गती देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नमुंमपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राजेश नार्वेकर यांनी निवडणूक विषयक कामकाज करणारे नवी मुंबई महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ, बेलापूर विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी श्री. संभाजी अडकुने, ऐरोली विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी...

लोकअदालतीमध्ये मालमत्ता कर, उपकर व स्थानिक संस्था कर थकबाकीची 5.55 कोटी

Image
नवी मुंबई - अतिरिक्त‍ जिल्हा न्यायालयामध्ये महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत थकीत मालमत्ता कर देयके, थकीतउपकर व स्थानिक संस्था कर देयके तसेच थकीतपाणी देयके वसूल करण्यासाठी थकबाकीदारांच्या तीन याद्या महानगरपालिकेमार्फत‍ अतिरिक्त‍ जिल्हा न्यायालयाला सादर करण्यात आलेल्या होत्या. त्यास अनुसरुन न्यायालयामार्फत सर्व थकबाकीदारांना लोकअदालतीला उपस्थित राहून थकीत रक्क्म भरणा करण्याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने नागरिकांनी मोठया संख्येने लगेचचथकीतदेयक रक्कम भरणा केली होती. त्याचप्रमाणे अनेक नागरिक थकीत बिलाची रक्कम भरणा करण्यासाठी बेलापूर कोर्टामध्ये उपस्थित राहिले. मालमत्ताकराच्या 834 थकबाकीदारांना नोटीस बजावण्यास आली होती. त्यांची थकीतरक्कम 11.12 कोटी इतकी होती. त्यापैकी 95 थकबाकीदारांनी महालोकअदालतीमध्ये 1.16 कोटी रक्कमेचा भरणा केला. अशाचप्रकारे उपकर व स्थानिक संस्था कराच्या 463थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी 29 थकबाकीदारांनी 4.39 कोटी रक्कमेचा भरणा केला. त्याचप्रमाणे महापालिका आयुक्त यांच्या मंजूरी...

इंडियन स्वच्छता लीग 2.0’ अंतर्गत सफाईमित्रांनी जल्लोषात फोडली स्वच्छतेची इकोफ्रेंडली दहीहंडी

Image
नवी मुंबई-  ‘इंडियन स्वच्छता लीग 2.0’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण क्षमतेने सहभागी झाली असून व्यापक लोकसहभागावर भर देत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर दिला जात आहे. यामध्ये सफाईमित्रांचा दहीहंडी महोत्सव असा एक अभिनव उपक्रम नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयकॉनिक मुख्यालय वास्तूसमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये शेकडो सफाईमित्रांनी व स्वच्छतामित्रांनी सहभागी होत दहीहंडी उत्सवाचा आनंद घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार यांनी उपस्थित राहून सहभागी सफाईमित्र व स्वच्छतामित्रांना प्रोत्साहित केले. दैनंदिन शहर स्वच्छता कामात मनापासून काम करणा-या स्वच्छतामित्र व सफाईमित्रांच्या कामाचा नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच सन्मान केलेला आहे. कोणत्याही राष्ट्रीय व राज्य सणाच्या दिवशी त्यांचा सन्मान करण्याची परंपरा नवी मुंबई महानगरपालिकेने सातत्याने जपली आहे.

रविवारी 17 सप्टेंबरला नवी मुंबईत आठही विभागांत हजारो विद्यार्थी व नागरिक घेणार स्वच्छतेची शपथ

Image
नवी मुंबई- 'इंडियन स्वच्छता लीग' मध्ये मागील वर्षी सर्वाधिक युवक सहभागाबद्दल देशात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळविणारे शहर म्हणून नामांकित नवी मुंबई शहर यावर्षीही इंडियन स्वच्छता लीग 2.0 मध्ये सहभागासाठी नमुंमपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज झालेले आहे. याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेचा नवी मुंबई इको नाईट्स हा संघ कर्णधार पद्मश्री शंकर महादेवन यांच्या नेतृत्वाखाली सज्ज झालेला असून नागरिक https://innovateindia.mygov.in/islseason2/ या लिंकवर क्लिक करून नवी मुंबईच्या संघातील सहभाग नोंदवित आहेत. लीग अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून त्यामध्येही नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहे. नमुंमपा आणि खाजगी शाळांमध्ये शुक्रवारी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत 431 शाळांमधील 1 लाख 83 हजार 144 विदयार्थ्यांनी सहभागी होत विक्रम नोंदविलेला आहे. या विक्रमाची नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ मध्ये घेण्यात आलेली आहे. स्वच्छ शहर ही नवी मुंबईची ओळख येथील स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण देशात दृढ झालेली आहे. त्या अनु...

भारत भूमि.. तुझ्यातला.. भारत चिरायू होवो - ॲड. पुजा प्रकाश एन.

Image
मुंबई महाराष्ट्र - हिन्दुस्थान आणि इंडिया असे दोन वेगळे देश, विचारधारा या  भूमीत वसतात. या दोन विचारधाराच्या मध्ये ८०% खेडेगावात विस्तारलेला भारतात मात्र दिवसेंदिवस गरीबी, भुकबळी, कुपोषण, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी वाढत चाललेली आहे, या वाढत्या समस्या चं मूळ शोधायचां प्रयत्न केला तर असं दिसत. हिंदुत्व वाद्यानी इंडिया ला सर्व पापाचा धनी मानले आहे.आधुनिक पाश्चात्य मूल्ये , पाश्चात्य विज्ञान , इंग्रजी औषधे , युरोपियन कायदे आणि अमेरिकन कुटुंब पद्धती पेक्षा  सकस आणि अस्सल असे काही  आहे ते हिन्दुस्थानात आहे असा त्यांचा दावा आहे. इंडिया ने युरोपियन बनण्याची खाज सोडून द्यावी असा आग्रह आहे. हिन्दुत्वाचां पुरस्कार आणि इंडिया चा धिक्कार ही राष्ट्रवादाची उजवी बाजू झाली. पण  डावी बाजूही  इंडिया चा द्वेष करण्यात किंचितही कमी नाही. खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण यातून गेल्या वीस वर्षात इंडिया निर्माण झाला आणि हा इंडिया भारताचा शोषक आहे असे डावे मानतात. उजवे भगवे आणि लाल डावे या दोघांचा सामायिक शत्रू "इंडिया" आहे हे नीट समजून घेतले पाहिजे. भांडवलशाही, इंग्रजी भाषिक , ...

सत्तेचं विकेंद्रीकरण व प्रगतीचा समतोल राखण्याकरीता भौगोलिक दृष्टया लहान राज्याची निर्मीती आवश्यक - एडवोकेट पुजा प्रकाश एन.

Image
वर्धा - दिनांक 5 सप्टेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या औंदा विदर्भ मिळवूचं या घोषणापत्रा अनुसार वर्धा येथे विदर्भ राज्य कार्यकारिणी आढावा बैठक प्रसंगी केंद्र सरकार ने प्रादेशिक विकासाचा समतोल राखण्याकरीता भौगोलिक क्षेत्रान्तर्गत संरचना करुन , सत्तेचे तथा विकासाचे विकेंद्रीकरण करून लहान लहान राज्याची निर्मीती करावी, लहान राज्याची निर्मीती झाल्यास त्या राज्याची आर्थिक स्थिति वृद्धिगंत होते, लोकांच्या आर्थिक प्रगतीचा निर्देशांक वाढीस लागतो, परिसरातील जनतेची प्रगती होते, परिणामस्वरूप आर्थिक, भौगोलिक, औद्योगिक विकास, करीता लहान लहान राज्याच्या निर्मीती करीता प्राधान्य दयावे असे प्रतिपादन सत्याग्रह फोरम राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट पूजा प्रकाश एन. यांनी केले.