Posts

Showing posts from July, 2023

रोजगार निर्माणाकरिता शासकीय स्तरावर सार्वजनिक प्रतिष्ठान निर्मिती आवश्यक - पूजा प्रकाश एन

Image
मुंबई महाराष्ट्र - भारतात दर वर्षी १ कोटी ६० लाख तरुण नोकरीच्या शोधात बाहेर पडत असतात, परंतु त्यांच्यासाठी फक्त १५ ते २० लाख नोक-यांची निर्मिती होत असते असे गंभीर चित्र आज या देशात आहे. मध्यंतरी ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेने एक पाहणी केली होती. या संस्थेचे निष्कर्ष बेरोजगारीचे भयानक चित्र स्पष्ट करतात. एका अर्थशास्त्रीय सव्‍‌र्हेप्रमाणे भारतात जवळजवळ ७७ टक्के कुटुंबात कायमस्वरूपी नोकरी करणारी व्यक्ती असत नाही. म्हणजेच रोजंदारी किंवा हंगामी नोकरी असते. तर ६७ टक्के कुटुंबे अशी आहेत की त्यांना महिन्याला १० हजारांपेक्षा कमी उत्पन्न असते. निती आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या त्रैवार्षीक कृती आराखडय़ात रोजगारी निर्मितीचे प्रमाण प्रचंड घटल्याचे स्पष्ट केले आहे. भारतातील राज्यांमधील तरुणांमध्ये बेरोजगारीचा प्रश्न फार भीषण झाला आहे. या राज्यांमध्ये तरुणांची संख्या भरपूर आहे. उद्योगधंदा काढण्यासारखी आर्थिक परिस्थिती नसते. लहान-सहान नोकरी सुद्धा मिळत नाही. अशा परिस्थितीत ही मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे सहज वळू शकतात, असा निष्कर्ष एका समाजशास्त्रीय सव्‍‌र्हेतून निघाल...

सामाजिक भान जपणारे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दीपक भाऊ निकाळजे यांनी जन्मदिवस सोहळा रद्द करून कुटुंबासमवेत जन्मदिवस केला संपन्न

Image
मुंबई - (बातमीदार) काल दिनांक २७ जुलै रोजी आरपीआय A राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांचा वाढदिवस असतो परंतु राज्यात तसेच देशातील सध्याची राजकीय अस्थिरता, महापूर,महागाई,बेरोजगारी,महिलांवर होणारे अत्याचाराने गंभीर स्वरूप धारण केले आहे. आणि आपण सगळेच समाजाचे देणे लागतो या अशा गंभीर परीस्थीती मध्ये आपला वाढदिवस कार्यकर्त्याना मोठया प्रमाणात साजरा न करण्याचे आव्हान केले व आपल्या निवासस्थानी  कुटुंबीयांनी अतिशय साध्या पद्धतीने औक्षण करून वाढदिवस साजरा केला. देशभरातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A च्या कार्यकर्त्यांनी लाखो  शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला प्रंसगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मालमत्ताकर न भरणा-या उद्योजकांच्या मालमत्ता सील तसेच उर्वरित थकबाकीदार लघुउद्योजकांवरही उगारणार अटकावणीचा बडगा - नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर

Image
नवी मुंबई - पालिका क्षेत्रातील मालमत्ता कर थकबाकीदारांच्या याचिकेवर आदेश पारीत करताना मा. सर्वोच्च न्यायालयाने 2 ऑगस्ट 2023 रोजी सुनावणीची पुढील तारीख देत त्यापूर्वी सर्व थकबाकीदार लघु उदयोजकांनी मालमत्ता कर भरवा असे आदेश दिले होते. जर मालमत्ता कर भरला नाही तर त्यादिवशी मा. सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार नाही असेही स्पष्ट केले होते. त्याचवेळी लघु उद्‌योजकांनी मालमत्ता कर भरणा केला नाही तर मालमत्ता कर वसूल करण्यासाठी थकबाकीदारांची मालमत्ता सील करण्याचे आदेशही नवी मुंबई महानगरपालिकेस देण्यात आले होते. त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 424 मालमत्ता कर थकबाकीदार लघुउद्योजकांना सौजन्य पत्र वितरित केली होती. या 424 थकबाकीदारांकडून 148 कोटी रक्कम भरणा केली जाणे अपेक्षित होते. तथापी 424 थकबाकीदारांपैकी केवळ 122 थकबाकीदारांनी मूळ मालमत्ता कर रक्कमेचा भरणा केला असून ही रक्कम साधारणत: 36 कोटी इतकी आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने आदेशित करुनही थकबाकीदार मालमत्ताकर धारकांनी अत्यल्प प्रतिसाद दिल्याचे लक्षात आल्याने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार मालमत...

नवी मुंबई पालिका आयुक्त श्री नार्वेकर यांचे अतिवृष्टी आणि आपत्कालीन काळात सतर्कतेचे आदेश

Image
        नवी मुंबई - 17 जुलैपासून मोठया प्रमाणात सुरु झालेल्या पावसाने जराही उसंत घेतली नसून 28 जुलैपर्यंत मागील 12 दिवसात नमुंमपा क्षेत्रात तब्बल 814.99 मि.मि. पर्जन्यवृष्टी झालेली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अतिवृष्टीमुळे नागरिकांची कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये याकरिता महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे परिस्थितीवर अत्यंत बारकाईने लक्ष असून संपूर्ण आपत्ती निवारण यंत्रणा दक्षतेने कार्यरत आहे.       महानगरपालिकेच्या अधिका-यांचा व्हॉटसॲप समुह तसेच आपत्ती व्यवस्थापन विषयक समूह यावर नियमित संपर्कात राहून आयुक्त स्वत: आढावा घेत आहेत. एखादी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याचे निराकरण होऊन काम झाल्यानंतरची छायाचित्रे प्राप्त होईपर्यंत आढावा घेतला जात असल्याने संपूर्ण यंत्रणा सतर्क राहून क्षेत्रीय स्थानांवर दक्षतेने काम करीत आहे.       नवी मुंबई हे शहर समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने मोठया भरतीच्या काळात अतिवृष्टी झाल्यास शहरातील काही सखल भागात पाणी साचते. अशी 14 ठिकाणे महानगरपालिकेमार्फत निश्चित ...

विधिमंडळ अधिवेशन लोक समस्याचं निराकरणाचं पर्व ठरावं - पूजा प्रकाश एन युवा नेतृत्व

Image
मुंबई महाराष्ट्र - विधिमंडळतर्फे दरवर्षी अधिवेशनांचे आयोजन केले जाते.यामध्ये पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन यांचा समावेश होतो. यापैकी पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये तर हिवाळी अधिवेशन हे उपराजधानी नागपूर या शहरामध्ये भरवण्यात येते. या सर्व अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषदमधील सदस्य सहभागी होतात. सत्ताधारी तसंच विरोधक यांच्यातर्फे अधिवेशनात विविध विषय मांडले जातात,सर्वजण चर्चेत सहभागी होतात, सत्ताधाऱ्यांतर्फे निर्णय घेतले जातात, काही विषयांवर ठराव मांडले जातात आणि मंजूर केले जातात.भरभरून घोषणा केल्या जातात व याद्वारे जनसामान्यांच्या जीवनात काय बदल होईल याचा विचार होतांना दिसत नाही,लोक प्रश्न कमी होण्याची चिन्ह दिसत नाही, मग कुणी म्हणेल, अधिवेशनाची गरज काय?कशाला एवढा खर्च? पण निकोप लोकशाही करीता सरकार लोकांकरीता आहे लोक मनात सरकार विषयी माहिती व्हावी करीता अधिवेशनाची गरज आहेचं, अधिवेशनाने होते तरी काय? तर जनतेला सरकार दिसते. लोकांना मंत्र्यांशी भेटता येते.आपले प्रश्न सांगता येतात. संघटना मोर्चे घेऊन येतात,आ...

मदतकार्यासाठी इर्शाळवाडीत जात असताना सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी श्री. शिवराम ढुमणे यांचे दुर्दैवी निधन

Image
नवी मुंबई रायगड - रायगड जिल्हयतील खालापूर तालुक्यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरण प्रकल्पानजिक असलेल्या इर्शाळवाडी येथे झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलाची मदतकार्य पथके रात्री 1 वाजताच्या सुमारास घटनास्थळी रवाना झाली होती. हा भाग अत्यंत दुर्गम असल्याने त्याठिकाणी कोणतेही वाहन जाऊ शकत नाही. अशावेळी मदतकार्य साहित्यासह पथकांमधील जवानांना पायीच चालत जावे लागत होते. यामध्ये मदतकार्यासाठी घटनास्थळाकडे चालत जात असताना नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलातील सहाय्यक केंद्र अधिकारी श्री. शिवराम यशवंत ढुमणे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. वयाच्या केवळ 48 व्या वर्षी झालेल्या त्यांच्या आकस्मिक निधनाबददल सर्व स्तरांतून तीव्र शोक व्यक्त्‍ करण्यात येत आहे.       नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीबीडी बेलापूर अग्निशमन केंद्रात श्री. शिवराम ढुमणे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. यावेळी अग्निशमन दलाच्या वतीने उपस्थित अग्निशमन जवानांनी आपल्या दिवंगत साहसी सहका-याला सलामी देत भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.     ...

समस्त आंबेडकरि समाजावर अन्याय दीडशे कुटुंबाचा मंत्रालयावर मोर्चा ..बेडग मिरजसांगली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान प्रशासनाने केली उध्वस्त..

Image
 सांगली  मिरज  : बेडग तालुका मिरज  येथील आंबेडकरी समाजातील सुमारे १५० कुटुंबांनी मंगळवारी गाव सोडून मुंबईकडे कुच केली. निळ्या ध्वजांसह महिलादेखील मोठ्या संख्येने लॉंग मार्चमध्ये सहभागी झाल्या आहेत. गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडणाऱ्यांवर कारवाईची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना करणार आहेत.बेडगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान भाजपची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीने एक महिन्यांपूर्वी जमीनदोस्त केली. यामुळे ग्रामपंचायत विरुद्ध आंबेडकरी समाज असा संघर्ष सुरु आहे. ग्रामपंचायतीने कमानीसाठी परवानगी दिली होती. मात्र, ती बेकायदा असल्याचे ठरवून १६ जून रोजी कमान पाडून टाकली. जिल्हाभरातील आंबेडकरी जनतेने याचा तीव्र निषेध केला.  कमान पाडल्यापासून गावातील वातावरण धगधगते असून वार-प्रतिवार सुरु आहेत. गेल्या आठवड्यात मिरजेत समाजाची बैठक झाली. त्यामध्ये निर्णायक आंदोलनाचा निर्णय झाला. मंत्रालयावर लॉंग मार्च काढण्याचे ठरले. त्यानुसार मंगळवारी सकाळीच मोठ्या संख्येने आंबेडकरी महिला-पुरुष नि...

पब्जी खेळता खेळता झाले प्रेम..पाकिस्तान मधून पळून आलेल्या सीमाला आतंकी गुप्तहेर चौकशीसाठी अटक

Image
दिल्ली - सीमा ज्या पद्धतीने न डगमगता सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहे, ते पाहून एटीएस सतर्क झाली आहे. नवी दिल्ली. यूपी एटीएस पाकिस्तानी सीमा हैदर आणि तिचा प्रियकर सचिन यांची चौकशी करत आहे. सोमवारीही सीमा, सचिन आणि सचिनच्या वडिलांची 8 तास चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन हा पहिला भारतीय तरुण नाही ज्याला ती PUBG च्या माध्यमातून भेटली होती. याआधीही ती भारतातील काही तरुणांच्या संपर्कात होती. सीमाने ज्यांच्याशी संपर्क साधला ते बहुतेक दिल्ली-एनसीआरमधील आहेत. सध्या यूपी एटीएस सीमा आणि सचिनची स्वतंत्रपणे चौकशी करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसने सोमवारी सीमा हैदरकडून इंग्रजीच्या काही ओळी वाचल्या होत्या, ज्या सीमाने केवळ चांगल्या प्रकारे वाचल्या नाहीत तर तिची वाचण्याची पद्धतही चांगली होती. सीमा ज्या पद्धतीने न डगमगता सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहे, ते पाहून एटीएस सतर्क झाली आहे. सीमेवर कोणी मार्गदर्शन करत आहे का, हे एटीएस तपासत आहे. सीमाच्या कुटुंबात किती लोक आहेत? सासरची आणि माहेरची लोकं काय करतात, कुठे राह...

सांग सांग भोलानाथ मुसळधार पाऊस कसा पडला .. मुंबईकरांचा प्रश्न

Image
मुंबई महाराष्ट्र - हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये 19 जुलैला रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने सांगितले की, मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, याशिवाय ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री मुंबईत जोरदार पाऊस झाला. सांताक्रूझ येथील IMD च्या बेस वेदर स्टेशनवर सोमवारी सकाळी 8:30 पर्यंत गेल्या 24 तासात 26 मिमी पाऊस झाला. सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत दक्षिण मुंबईत 50.8 मिमी, तर टाउनशिपमध्ये 36.9 मिमी पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे कमाल तापमान 27.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सामान्यपेक्षा एक अंश कमी आहे. मुंबईत मुसळधार पाऊस, पुढील 24 तासांसाठी 'यलो अलर्ट' जारी मुंबई आणि उपनगरात सोमवारी रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मंगळवारी या भागात अतिवृष्टीचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. पावसामुळे मध्य रेल्व...

जन्मदिनाच्या दिवशी देहदानाचा संकल्प - युवा नेतृत्व पूजा प्रकाश एन

Image
पुणे-  जन्मदिन विशेष बातमी  "मरावे परी कीर्ती रुपी उरावे'’ या उक्तीचा प्रत्यय देहदान ही संकल्पना देते. मात्र समाजात अवयवदान, देहदानाविषयी कमालीचा संभ्रम असून देहदान करणाऱ्यांची टक्केवारी अत्यल्प आहे. लोकांमध्ये याबाबत जनजागृती होण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे. सामाजिक संस्था प्रयत्नशील असल्या तरी ‘देहदान’ संदर्भात केवळ अर्ज भरत औपचारिकता पार पाडली जात असल्याचे चित्र आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एखादी शस्त्रक्रिया करण्यासाठी,अपघाताशी संबंधित जलद उपचारासंबंधित तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करण्यासाठी मानवी मृतदेह गरजेचा आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अशा मृतदेहांची कमतरता असून त्यामुळे वैद्यकीय विशेषत शस्त्रक्रिया विषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. देहदान म्हणून येणाऱ्या मृतदेहांचा वापर हा विद्यार्थ्यांना शरीरशास्त्र अभ्यास, शस्त्रक्रियेसाठी करण्यात येतो. देहदानाचा वैद्यकीय शिक्षण-संशोधनासाठी उपयोग होत असला तरी अभ्यास आणि संशोधनासाठी मृतदेहांचा तूटवडा जाणवत असल्याचे सत्य आह...

रिक्त मंत्री पदावर नियुक्ती महाराष्ट्र शासन राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

Image
  मुंबई  (मुख्यमंत्री सचिवालय) - दि. १४: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.  इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे: छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय हसन मियाँल...

जाहिरातीच्या माध्यमातून भारतीय समाजमना वर होत असलेल्या वाईट परिणामावर रचलेली विडंबनात्मक रचना...

Image
काजू बदाम सोडून आता       गुटखा प्रसिद्ध झाला  अजय, अक्षय, शाहरूख सुद्धा       विमलच खा म्हणाला  बंद झाल्या शिक्षण जाहिराती       जुगार प्रसिद्ध झाला  हिंदी मराठी कलाकार सुद्धा       रमीच खेळा म्हणाला  बंद झालेत मैदानी खेळ       मोबाईल वेडा झाला  भर त्यात आय पी एल ची      त्यातही जुगार आला  ख्रिस गेल कपिल सुद्धा       केसरच खा म्हणाला  पामोलीव्ह का जबाब नही       तो ही विसरून गेला   जॅकी सुद्धा गायछाप खातो       तो ही तेच म्हणाला  गुटख्या मुळेच धारीवाल सुद्धा       इतका श्रीमंत झाला  जुगार, दारू, सिग्रेट, गुटखा       इतका प्रसिद्ध झाला  कुणीच नाही म्हणत याला       तुम्ही आळा घाला बरबाद होत आहे तरुण पिढी       समाज व्यसनी झाला  नाचवतो आणून गौतमी पाटील   ...

विचारधारेचा अस्त - काय सांगतात विचारवंत पुजा प्रकाश वाचा लेख

Image
  पुणे -  सेना भाजप युती, पुढे महाविकास आघाडी ते आत्ताची निनावी आघाडी. आज नीलमताई गोरे यांनी पक्ष बदलला . राष्ट्रवादीत कुठे कोण ते ठरायचंय. पंकजाताई मुंडें भाजप सोडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा एक गट फुटीच्या पावित्र्यात आहे . सर्वपक्षीय सर्वसामान्य मतदार आता बोअर झाले आहेत. राज्यशास्त्र विषयात  End of Ideology ( विचारधारांचा अंत ) नावाची एक संकल्पना पूर्वीपासून चर्चेत आहे.  डॅनियल बेल नावाच्या विचारवंताने १९६० च्या सुमारास याच नावाचे पुस्तक लिहिले होते. त्याच्या म्हणण्यानुसार तत्कालीन राजकीय विचार कालबाह्य झाला होता. कम्युनिस्ट , सोशॅलिस्ट , नेशनालिस्ट वगैरे राजकीय विचारधारा बाद झाल्या आहेत …. आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनात यातल्या कोणत्याच राजकीय विचारधारा कोणताच फरक पाडू शकत नाहीत . तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगतीचा वेग यापुढे जीवनमान ठरवेल.  डॅनियल बेल ने त्याच पुस्तकात अजून एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे. तो मुद्दा राजकीय क्रांती बद्दल आहे . युरोपात गेली अनेक वर्ष राजकीय विचारांची युद्धे झाली . क्म्युनिस्ट , फेसिस्ट इत्यादी राजकीय कारणासाठी रक्तप...

First time in india Mumbai police cyber cell recovers Bitcoin scam money

Image
Mumbai - The Central Home Office took note of this as it is believed to be the first case in the country of recovery of fraudulent amounts in cryptocurrencies through fake links from foreign wallets. Yogesh Jain, a resident of JP North, Mira Road, was lured by two mobile phone holders from Hong Kong in February 2022 to earn high profits by giving them tips on Bitcoin trading through the BTC India WhatsApp group. Jain purchased 39 thousand 596 USDT by spending 33 lakh 65 thousand from Binance app and according to him paid in BTC coin trading app through unknown link. Later that app and Amy's number were closed. With the help of Crypto Helpline, an American New York based company, Jain prepared a detailed report on the transfer of money to some apps and wallets. In May 2022, when Jain complained to the cyber branch, police inspector Sujit Kumar Gunjkar, assistant inspector Swapnil Vaval, sub-inspector Prasad Shenolkar, enforcer Praveen Awad started an investigation based ...

Rapid action by Nmmc Commissioner Rajesh Narvekar to solve Satellite city's parking problem.

Image
Navi Mumbai - In order to solve the parking problem in Navi Mumbai city, nmmc Commissioner Rajesh Narvekar has started taking planning steps and by conducting regular review meetings, in cooperation with the traffic police department, action is being taken to determine the parking policy of Navi Mumbai city. In connection with this, taking a special meeting, Nmmc Commissioner Rajesh Narvekar reviewed in detail the details of suitable parking spaces observed during the inspection conducted with the local traffic police at the divisional level as per the instructions given in the meeting held on June 28. Additional Commissioner Sanjay Kakde, City Engineer Sanjay Desai, Deputy Commissioner of Property Department Nitin Narvekar, Deputy Commissioner of Traffic Police Tirupati Kakde and Executive Engineers of all departments were present on this occasion. In the June 28 meeting, the department officer through the commissioner had directed to conduct a joint review with the traffi...

Reentry and suspension campaign started in NCP by Chief Sharad Pawar

Image
 Maharashtra - NCP Chief Sharad Pawar has expelled three leaders from the party. All the three leaders had attended the swearing-in ceremony of Ajit Pawar. On Sunday, Sharad Pawar's nephew Ajit Pawar rebelled against the party and decided to go with the BJP. Within minutes of the mutiny, he reached the Raj Bhavan and took oath as Deputy Chief Minister in the Maharashtra government. Along with Ajit Pawar, 8 other MLAs also took oath as ministers. After taking the oath, Ajit Pawar had claimed that there is no division in the NCP, the entire party has come together in support of the BJP government. On the other hand, NCP has also taken action against its leaders. On Monday, the party showed the way out to three leaders. It is alleged that all three had attended the swearing-in ceremony of Ajit Pawar. The NCP has expelled Mumbai division chief Narendra Rathod, Akola city district chief Vijay Deshmukh and state minister Shivaji Garje from the party.

शरद पवार यांचे विश्वासू आणि प्रामाणिक नेते जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादीच्या विरोधी पक्ष नेते पदी नियुक्ती

Image
मुंबई महाराष्ट्र-  आज दिनांक 2 जुलै रविवार रोजी महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या ऑपरेशन लोटस या मोहिमेत आणि राजकीय घडामोडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित दादा पवार यांनी शिंदे भाजपा गट सरकार सोबत हात मिळवत  महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याचबरोबर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचे अनेक आमदार यांनाही ते घेऊन गेले याप्रसंगी राष्ट्रवादीतील अनेक ज्येष्ठ व प्रामाणिक नेते यांनी मात्र आदरणीय शरद पवार यांच्यासोबत राहून पक्षाबद्दलचा प्रामाणिकपणे दाखवला याचवेळी ठाणे जिल्ह्यातील वाघ माननीय जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली त्याचप्रमाणे त्यांची पक्षाच्या विप या पदावर देखील नियुक्ती करण्यात आली. जितेंद्र आव्हाड (५९) हे ठाण्यातील मुंब्रा-कळव्याचे तीन वेळा आमदार आहेत. त्यांनी यापूर्वी 2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडी सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादन आणि 2019 ते 2022 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण आणि ...

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप अजित दादा महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार स्थापन- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
मुंबई महाराष्ट्र - ऑपरेशन लोटसचाच एक भाग असलेल्या या मोहिमेत भाजप सरकार यशस्वी झाले आहे अशी प्रसिद्धी माध्यमांमध्ये चर्चा असताना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला तसेच महाराष्ट्राला एक मोठा राजकीय भूकंप पाहण्यास मिळाला. शपथविधी यशस्वी झाल्यानंतर आज अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज सकाळपासूनच राजकियी हालचालींचा वेग आलेला होता. आधी अजित पवारांनी त्यांच्या समर्थकांसोबत बैठक घेतली. त्यानंतर ते समर्थक आमदारांसह राजभवनात पोहोचले. अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील राजभवनात दाखल झाले होते. त्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीला आता दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र फ...