Posts

आंतरराष्ट्रीय योग दिन वाशीमध्ये उत्साहात साजरा – वनमंत्री आणि प्रशासक यांचा संयुक्त योगा......कार्यक्रमाचे विशेष आकर्षण

Image
वाशी नवी मुंबई | २१ जून २०२५ –(प्रतिक यादव)  नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन सिडको एक्झिबिशन सेंटर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे आणि महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मा. गणेश नाईक यांनी एकत्र येत नागरिकांसमवेत योग साधना केली आणि उत्तम आरोग्यासाठी मिळून योगा करून योग जनजागृती संदेश दिला. या कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई महापालिका उपायुक्त डॉ. अजय गडदे , अभिलाषा म्हात्रे आणि स्मिता काळे यांनी केले होते. वनमंत्री गणेश नाईक आणि डॉ कैलास शिंदे प्रशासक यांचा संयुक्त योगा  या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि नवी मुंबई महानगरपालिका प्रशासक डॉ कैलास शिंदे यांनी दोन योग साधक यांनी मिळून करण्यात येणाऱ्या योगा प्रकारात मिळून विविध योग आसने केल्याने कार्यक्रमाची उंची वाढली आणि नवी मुंबईतील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला. आमदार मंदा म्हात्रे यांची उपस्थिती कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आले होते, ...

सुनील पारकर यांचे आयुक्तांना निवेदन... कोपरखैरणे येथील चिकनेश्वर उद्यानाच्या प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी विनंती

Image
 नवी मुंबई – कोपरखैरणे ब्लॉक काँग्रेस कमिटीच्यावतीने सुनीलदादा पारकर आणि सहकारी यांच्याकडून आज नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन चिकनेश्वर उद्यानातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात शौचालयाची उभारणी, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, ओपन जिमसाठी आवश्यक साहित्याची उपलब्धता आणि दररोज दोन सुरक्षारक्षक नेमणे ही प्रमुख मागणी करण्यात आली. पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी याबाबत उद्यानातील वाढत्या वापराची, नागरीकांच्या सुरक्षिततेची आणि सार्वजनिक सुविधांच्या गरजेची सविस्तर माहिती आयुक्तांना दिली. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उद्यानाचा दौरा करताना नागरिकांकडून आलेल्या तक्रारी आणि सूचनांचाही अहवाल महापालिकेला दिला. आयुक्तांनी या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवत लवकरच आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. या भेटीदरम्यान श्री.सुनिलदादा पारकर साहेब, श्री.अभिजीत बापूराव काकडे,श्री.विकास विठ्ठल शिंदे श्री.अमित हांडे ,श्रीमती.हुरूनिशा खान मॅडम, श्री.प्रभुकोरे, श्री.विशाल शुक्...

महाराष्ट्रातील पहिला वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित...नवी मुंबई पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचा RPi A पदाधिकाऱ्यांकडून सत्कार...

Image
नवी मुंबई : महाराष्ट्रात प्रथमच वस्त्र पुनर्प्रक्रियेचा अभिनव प्रकल्प सुरू केल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) कडून सन्मान करण्यात आला. RPI (A) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या पक्षातील नवी मुंबई चे शिष्टमंडळ – नवी मुंबई संपर्कप्रमुख प्रतीक यादव, ऐरोली विधानसभा अध्यक्ष अमोल जावळे, विनोद इंगळे वरिष्ठ नेते यांनी आयुक्त डॉ कैलास शिंदे यांचा सत्कार करत त्यांच्या समाजोपयोगी कार्याची स्तुती केली. डॉ. कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमात टाकाऊ कपड्यांवर प्रक्रिया करून दैनंदिन जीवनात उपयोगी वस्तू – जसे की कापडी पिशव्या, मॅट, डिझायनर जॅकेट्स, लॅपटॉप बॅग्स इत्यादी – तयार केल्या जात आहेत. हा उपक्रम देशपातळीवर दुसरा असून, महाराष्ट्रात प्रथमच राबवला जात आहे. नवी मुंबईतील बेलापूर सेक्टर-४ येथील बहुउद्देशीय इमारतीत हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाला केवळ स्थानिकच ...

मुंबई फॉर पीस....बुद्धांचा शांतीचा आणि प्रेमाचा संदेश देण्यासाठी मुंबईत पदयात्रा आणि शांतता रॅली

Image
मुंबई - (प्रतिक यादव )मुंबई सिटी ऑफ ड्रीम्स अर्थात स्वप्नांचे शहर अशी ख्याती असलेल्या आशिया खंडातील महत्त्वाचे जागतिक इंटरनॅशनल सिटी म्हणजे मुंबई अशी ओळख निर्माण झालेल्या आपली मुंबई या शहरात दिनांक 2 जून रोजी विश्वगुरू भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला शांती प्रेम दया आणि करुणा हा मानवतेचा शांततेचा प्रेमाचा संदेश देत मुंबई फॉर पीस हा नारा देत मुंबई प्रांतातील समाजसेवकांकडून शांतता रॅली आयोजित करण्यात आली होती. विविध जाती धर्मातील वाढणारा जातीभेद आणि असंतोष नष्ट करण्यासाठी तसेच सामाजिक एकता वाढवण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला समानतेचा हक्क अबाधित राखण्यासाठी मुंबई शहरात दादर येथे कोतवाल नगर ते दादर चैत्यभूमी या परिसरात या शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या शांतता रॅलीत हजारो नागरिकांनी समाजसेवकांनी भाग घेतला तसेच मुंबई फोर पीस असा संदेश देणारे बॅनर प्रकाशित प्रदर्शित करून सामाजिक एकतेचा संदेश दिला. मुंबई फॉर पीस या शांतता रॅलीतून भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिला गेलेला एकात्मतेचा समानतेचा शांतीचा आणि बंधू भावाचा संदेश जन माणस...

संतोष सुतार यांचे आयुक्तांना स्मरणपत्र... शिरवणे मधील फेरीवाल्यांसाठी बांधलेली इमारत सुरू करण्यास विनंती.

Image
बेलापूर - नवी मुंबई पालिका क्षेत्र ऐरोली ते बेलापूर या परिसरात पालिकेच्या विविध विभागात मार्फत अनेक विकास कामे होत आहेत शहराचा विकास होत आहे शहराचा कायापालट होत आहे परंतु अजूनही नवी मुंबई शहरातील काही गावात मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाही त्यामुळे आगरी कोळी वस्ती असलेल्या गाव सदृश्य भागात विकास कामांकडे दुर्लक्ष होत आहे.  संतोष सुतार काँग्रेस पक्षातील ओबीसी सेल नवी मुंबई अध्यक्ष यांनी शिरवणे गावातील महत्त्वाच्या अतिप्रलंबित विषयाकडे पालिकेचे लक्ष वेधले आहे. सन 2010 साली बांधण्यात आलेली फेरीवाल्यांसाठी भाजीवाल्यांसाठी इमारत अजून सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे विषयाअंतर्गत नवी मुंबई पालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांना संतोष सुतार यांनी पत्र व्यवहार करून सदर इमारत सुरू करण्यासाठी विनंती केली होती परंतु विनंती करून देखील कोणतेच ठोस पाय योजना न झाल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा स्मरणपत्र देऊन आयुक्तांचे लक्ष वेधले आहे तरी येणाऱ्या काळात शिरवणे गावातील ही इमारत कधी सुरू होईल याकडे शिरवणे गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच ही इमारत कोणत्याही परिस्थितीत पालिकेची ...

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..

Image
मुंबई २५ मे २०२५: भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या कथित अवमानाचे प्रकरण आता अधिकच गुंतागुंतीचे झाले असून, या प्रकरणाची पुढील दिशा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी RIT याचिकेवरील सुनावणीवर अवलंबून आहे. विशेषतः, सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी दाखल केलेल्या याचिकेला निष्प्रभ करण्यासाठी "मनुवाद्यांकडून" कट रचल्याचा आरोप सुप्रीम कोर्टाचे एडवोकेट नितीन सातपुते यांनी केला आहे आणि या प्रकरणाला जातीय वळण मिळाले आहे. सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांच्यामार्फत एडवोकेट शोभा बुद्धिवंत यांची फौजदारी RIT याचिका* भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम महाराष्ट्रात प्रवेश केला असता त्यांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्टाचार प्रोटोकॉल पाळण्यात आला नसल्याने केवळ ते बौद्ध समाजातील व्यक्ती असल्याकारणाने महाराष्ट्र शासनाने त्यांना जाणीवपूर्वक प्रोटोकॉल दिला नाही. या गंभीर घटनेची दखल घेत, समाजसेवी वृत्तीचे सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांच्यामार्फत एडवोकेट शोभा बुद्धिवंत यां...

कोपरखैरणेत सिंगल यूज प्लास्टिकच्या खुल्या विक्रीविरोधात कोपरखैरणे काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष सुनील पारकर यांची कृती.

Image
नवी मुंबई, २५ मे २०२५: कोपरखैरणे परिसरात सिंगल यूज प्लास्टिकच्या सर्रास वापरावर आणि खुल्या विक्रीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) अधिसूचनेचे उल्लंघन होत असल्याने कोपरखैरणे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष आणि पर्यावरणप्रेमी समाजसेवक सुनील पारकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी कोपरखैरणे वार्ड अधिकाऱ्यांना पुराव्यासह पत्र लिहून सिंगल यूज प्लास्टिकच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सिंगल यूज प्लास्टिक जसे की, प्लास्टिकचे चमचे, आईस्क्रीमच्या कांड्या, प्लास्टिकचे झेंडे आणि ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. मात्र, कोपरखैरणे परिसरात दुकानदार आणि व्यापारी हे नियम धाब्यावर बसवून खुलेआम या वस्तूंची विक्री करत आहेत. यामुळे पर्यावरणाला गंभीर हानी पोहोचत आहे. समाजसेवक सुनील पारकर यांनी पर्यावरण संरक्षणासाठी ठोस पाऊल उचलत नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोपरखैरणे वार्ड अधिकाऱ्यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी सिंगल यूज प्लास्टिकच्या विक्रीचे पुरावे सादर करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. “पर्यावरणाचे र...