आरपीआय आठवले गट नवी मुंबई कार्याध्यक्ष धरमशी रावरिया आणि जिल्हाध्यक्ष महेश खरे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेणार



नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील नागरिक सध्या अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे सामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांचा संताप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे नवी मुंबई कार्याध्यक्ष धरमशी रावरिया (पटेल) आणि जिल्हा अध्यक्ष महेश खरे आणि शिष्ट मंडळ यांनी पालिकेच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अधिकाऱ्यांकडून समस्यांचे निराकरण नाही

धरमशी पटेल यांनी सांगितले की, “नवी मुंबईतील अनेक विभागांत रस्त्यांची खराब अवस्था, पाणीपुरवठ्यातील अनियमितता, कचऱ्याचे ढीग, बंद स्ट्रीट लाइट्स, नाल्यांची नियमित सफाई नसणे अशा समस्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मात्र, प्रशासन आणि संबंधित अधिकारी वर्ग या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.”त्यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, नागरिकांना वारंवार तक्रारी करूनही त्यांचे म्हणणे ऐकले जात नाही, त्यामुळे सामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

अतिक्रमण विभागाची कठोर कारवाई – सामान्य नागरिक त्रस्त

नवी मुंबईतील अतिक्रमण विभागाने अलीकडच्या काळात अनेक भागांमध्ये नागरिकांनी बांधलेल्या घरांवर तोडक कारवाई सुरू केली आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबे अधिकच संकटात सापडली आहेत. “गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कोणतेही पर्याय न देता कारवाई करणे अन्यायकारक आहे,” असे पटेल यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेणार -धरमशी रावरीया पटेल महेश खरे आणि शिष्ट मंडळ..

या परिस्थितीवर त्वरित तोडगा निघावा, यासाठी धरमशी रावरिया पटेल आणि महेश खरे आणि पक्षातील ज्येष्ठ अधिकारी लवकरच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेणार आहेत. त्यांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारकडे तक्रार करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार असल्याचे सांगितले आहे. नागरिकांचा उद्रेक वाढत आहे . त्वरित उपाययोजना आवश्यक यासोबतच, स्थानिक नागरिकांनीही प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. “आम्हाला केवळ आश्वासने नकोत, प्रत्यक्ष कृती हवी,” असे अनेक नागरिकांनी सांगितले.जर लवकरच समस्यांचे निराकरण झाले नाही, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गट मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे.

“आम्ही सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढत राहू,” असे धरमशी रावरिया (पटेल) यांनी ठामपणे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..

डॉ. संजय तारळेकर: नवी मुंबईतील प्रसिद्ध समाजसेवी हृदय विकार तज्ञ