नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील नागरिक सध्या अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे सामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांचा संताप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे नवी मुंबई कार्याध्यक्ष धरमशी रावरिया (पटेल) आणि जिल्हा अध्यक्ष महेश खरे आणि शिष्ट मंडळ यांनी पालिकेच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांकडून समस्यांचे निराकरण नाही धरमशी पटेल यांनी सांगितले की, “नवी मुंबईतील अनेक विभागांत रस्त्यांची खराब अवस्था, पाणीपुरवठ्यातील अनियमितता, कचऱ्याचे ढीग, बंद स्ट्रीट लाइट्स, नाल्यांची नियमित सफाई नसणे अशा समस्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मात्र, प्रशासन आणि संबंधित अधिकारी वर्ग या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.”त्यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, नागरिकांना वारंवार तक्रारी करूनही त्यांचे म्हणणे ऐकले जात नाही, त्यामुळे सामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अतिक्रमण विभागाची कठोर कारवाई – सामान्य नागरिक त्रस्त नवी मुंबईतील अ...
Comments
Post a Comment