Posts

Showing posts from April, 2024

भारतीय राजकारणात महिलांचा सहभाग समप्रमाणात वाढायला हवा एडवोकेट पुजा प्रकाश एन यांनी पत्रकार परिषदेत केले आवाहन

Image
मुंबई - भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात सृदृढ़ लोकशाही म्हणून गणना होते गेल्या सात दशकाचा मागोवा घेतला तर भारतात कार्यपालीका व राजकीय व्यवस्थेमध्ये स्थान मिळवणेकरीता महिलांना खुप मोठा संघर्ष करावा लागला लढा उभारावा लागला या लढ्याचे फलीत म्हणजे महिलांना कार्यपालीका व्यवस्था मध्ये ३३%आरक्षण प्राप्त झाले,व पुढे महिला आरक्षण विधेयकाची १२८वी घटना दुरुस्ती लोकसभा व राज्यसभेत मंजूर झाली तरी प्रत्यक्ष अमलात येण्याची कालमर्यादा निश्चित नाही. कारण जनगणना, त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना ही सारी प्रक्रिया पार पडल्यावरच महिला आरक्षण प्रत्यक्षात अमलात येईल. पण महिला आरक्षणाचा मुद्दा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून चर्चेत आहे. सर्वांत आधी स्थानिक स्वराज्य संस्थेत महिला आरक्षण मिळालं. त्यानंतर, आता हा प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेपर्यंत पोहोचला आहे.  या लढ्याचे व्यापक स्वरुप म्हणजे राजकीय क्षेत्रात सुद्धा स्थानीक स्वराज्य संस्था मध्ये ५०%आरक्षण मिळाले हि बाब स्वागतार्हचं आहे,महिलांच्या सन्मानाची ही खरी सुरवात आहे पण हेच प्रमाण विधानसभा व लोकसभा या ठिकाणी का नाही,आज जवळपास प्रत्येक ...

हजारो भीम बांधवांचा जल्लोष ...डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समिती माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर जयंती छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

Image
वाशी नवी मुंबई- दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे येथे विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वा जन्मदिन अर्थातच जयंती उत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी समिती अध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई प्रांतातील विविध प्रभागांमधील आलेल्या हजारो भीम अनुयायी यांनी एकत्र येऊन भीम जयंतीचा जल्लोष करून आनंद लुटला. या जल्लोषात प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनीही या संयुक्त जयंती वेळात वेळ काढून भेट दिली तसेच जमलेल्या हजारो भीम बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व जयंती उत्साहात सहभाग घेतला. त्याचप्रमाणे समिती अध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड यांनी संपूर्ण नवी मुंबईमध्ये अशी जयंती दरवर्षी सहाणे जल्लोषात व अजून मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरी केली जाईल असे प्रतिपादन केले त्याचप्रमाणे नवी मुंबईतील प्रथमच वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरी करण्यात आलेल्या संयुक्त जयंती यशस्वी करण्यासाठी तन-मन धन अर्पण करून उत्साहाने कार्य केलेल्या सर्व समिती ...